म्हैसाळचे पाणी ‘शिरनांदगी‘त सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

म्हैसाळचे पाणी ‘शिरनांदगी‘त सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी
म्हैसाळचे पाणी ‘शिरनांदगी‘त सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागाला म्हैसाळचे पाणी मिळावे, यासाठी या योजनेचे काम बंद पाडण्यात आले. त्यानंतर आता या योजनेचे पाणी शिरनांदगी तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. 

म्हैसाळचे काम सुरू झाल्यापासून या योजनेचे पाणी तालुक्याला मिळावे, अशी मागणी आहे. पण आतापर्यंत केवळ आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. केवळ सहा हजार हेक्टरचाच समावेश यामध्ये करण्यात आला. पण, म्हैसाळच्या आराखड्यानुसार तलावात पाणी सोडण्याची तरतूद नसल्याने अधिकाऱ्यांनी सुरवातीला पाणी सोडण्याचे आश्वासन देऊनही नंतर हात वर केले. त्यामुळे या भागातील शेतकरी संतप्त आहेत. सध्या या योजनेतून निश्चित असलेल्या गावात मात्र जोरात काम सुरू आहे. पण, शिरनांदगी तलावावर अवलंबून असलेले शिरनांदगी, चिक्कलगी, रड्डे, निंबोणी या गावांना मात्र पाण्याची प्रतीक्षा आहे.

शिरनांदगी तलावात पाणी सोडल्यास जवळपास या भागातील अकराशे हेक्टरला लाभ होईल. म्हैसाळच्या आराखड्यामध्ये या तलावात पाणी सोडण्याची तरतूद करावी, अशी मागणी घेऊन जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला गोडसे यांनीही सातत्याने पाठपुरावा केला.

विधिमंडळाच्या अधिवेशनातही आमदार तानाजी सावंत यांच्या माध्यमातून त्यांनी याबाबत पाठपुरावा केला. पण त्याला कितपत यश येते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com