म्हैसाळ योजनेतून तलाव भरून देण्याची मागणी

सांगली ः म्हैसाळ उपसा योजना सुरू होऊन महिन्याचा काळ लोटला, तरी देखील या योजनेच्या लाभ क्षेत्रातील तलाव अद्यापही पाण्याने भरून दिले नाहीत. परिणामी पाणी टंचाईची भीषणता वाढू लागली आहे. तलाव भरून दिले नाही तर द्राक्ष, डाळिंब पिकासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान अटळ आहे. त्यामुळे योजनेतून लाभ क्षेत्रातील तलाव, बंधारे पाण्याने भरून द्यावेत, अशी मागणी होत आहे.
Demand for filling of lake from Mahisal scheme
Demand for filling of lake from Mahisal scheme

सांगली ः म्हैसाळ उपसा योजना सुरू होऊन महिन्याचा काळ लोटला, तरी देखील या योजनेच्या लाभ क्षेत्रातील तलाव अद्यापही पाण्याने भरून दिले नाहीत. परिणामी पाणी टंचाईची भीषणता वाढू लागली आहे. तलाव भरून दिले नाही तर द्राक्ष, डाळिंब पिकासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान अटळ आहे. त्यामुळे योजनेतून लाभ क्षेत्रातील तलाव, बंधारे पाण्याने भरून द्यावेत, अशी मागणी होत आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. त्यामुळे मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुक्‍यातील शेतीला या टंचाईत आधार मिळाला आहे. त्यामुळे बळीराजा समाधानी आहे. वास्तविक पाहता हे आवर्तन मुख्य कालव्यातूनच जत तालुक्‍याच्या शेवटच्या लाभ क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे.

मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुक्‍यात द्राक्षाची खरड छाटणी पूर्ण झाली आहे. तर डाळिंबाच्या मृग बहाराची तयारी शेतकरी करू लागला आहे. आता या पिकांना पाण्याची आवश्‍यकता आहे. तर काही ठिकाणी टॅंकरने शेतीला पाणी पुरवठा सुरू झाला आहे. मुळात, एका बाजूला योजना सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला या योजनेच्या लाभ क्षेत्रात असणारे बंधारे, लघू व मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत.

सध्या जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी व्यस्त आहे. परंतु त्यातून प्रशासनाने दुष्काळी पट्ट्यातील तलाव, बंधारे पाण्याने भरून देण्यासाठी नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र, तशा कोणत्याही हालचाली केलेल्या दिसत नाहीत. गेल्या आठवड्यात पुराचे पाणी दुष्काळी भागात देण्याबाबत बैठक झाली होती. त्यावर निर्णयही झाला. त्याचे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले. परंतू सध्या पाणी टंचाई आहे. आत्ताचा प्रश्‍न मार्गी लागणे गरजेचे होते पण त्यावर लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.

योजना उशाला अन् कोरड घशाला म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या मुख्य पंपहाऊस पासून अवघ्या काही अंतरावर आरग हे गाव आहे. या गावातील तलाव कोरडा पडला आहे. याचाच अर्थ असा की, योजना या गावापासून जवळ असून देखील पाणी दिले नाही. मग दुष्काळी भागातील तलाव कोणत्या आधारावर भरून देणार असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com