उसाची एफआरपी तीन हजार रुपये करण्याची मागणी

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखरेचा किमान दर वाढवल्यास उसाची एफआरपी १० रिकव्हरी बेसला २७५० वरून तो वाढवून १० रिकव्हरी बेसला ३००० रुपये करावी, अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी केली आहे.
उसाची एफआरपी तीन हजार रुपये करण्याची मागणी
उसाची एफआरपी तीन हजार रुपये करण्याची मागणी

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखरेचा किमान दर वाढवल्यास उसाची एफआरपी १० रिकव्हरी बेसला २७५० वरून तो वाढवून १० रिकव्हरी बेसला ३००० रुपये करावी, अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी केली आहे.

पत्रकात म्हंटले आहे की, साखरेचा किमान दर ३१०० वरून ३५०० रुपये करण्याची मागणी साखर कारखान्यांची संघटना करत आहे. केंद्र सरकार ही अशी वाढ करण्याच्या विचारात आहे. साखरेचा किमान दर २९०० वरून ३१०० केला गेला त्यावेळी या कारखान्यांनी उसाचा दर एफआरपी प्रमाणेच दिला. वाढलेल्या साखर दराचा फायदा कारखान्यांनी स्वत्ताकडे ठेवला. आता जर हा दर ३१०० वरून ३५०० रुपये केला तर बाजारातील साखरेचा दर ४० रुपयाच्या पुढे जाणार आहे. या वाढलेल्या दराचा फायदा कारखाने शेतकऱ्यांना देणार नाहीत. उसाचा वाढलेला उत्पादन खर्च आणि उसाचे घटलेले एकरी उत्पादन त्याचबरोबर वाढता तोडणी वाहतूक खर्च व कारखान्यांची घटलेली रिकव्हरी याचा विचार करून राज्य शासनाने उसाची एफआरपी वाढवण्याची शिफारस केंद्राकडे करावी. सरकारने ग्राहक, शेतकरी आणि कारखानदार यांचा समतोल विचार करून निर्णय घ्यावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com