धुळे : जिल्ह्यात या आठवड्यात झालेल्या वादळी पावसात पिकांसह शेडनेट, पॉलिहाऊस, पशुधनाच्या गोठ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
साक्री तालुक्यात वादळी पावसात उंभरे, देगाव, दिघावे, शेवडीपाडा, उंभर्टी आदी भागात कांदा, कापूस, मका, सोयाबीन व इतर खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. काही घरांचे नुकसानही झाले. उंभरे येथील शेतकरी विलास पाटील यांच्या शेडनेटमध्येही मोठी हानी झाली. प्रवीण अहिरे, भीमराव अहिरे यांच्या पपई बागांना फटका बसला. या नुकसानीची पाहणी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. हिना गावीत यांनी केली.
धुळे जिल्हा परिषदेतील सदस्या सुमित्राबाई गांगुर्डे, विजय ठाकरे, वसंत घरटे, उत्पल नांद्रे, सुधीर अकलाडे, मनोज चौरे, शेलेंद्र आजगे, प्रकाश अकलाडे, बन्सी ठाकरे आदी उपस्थित होते. तर पिंपळनेर, उमरे भागातही कांदा, शेडनेट आदींचे नुकसान झाले आहे. पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव यांनी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.