भारतात होणारी सोयापेंड निर्यात थांबविण्याची मागणी 

भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यानंतर बांगलादेशातून अर्जेंटिनानंतर सर्वाधिक आयात होत आहे. मात्र बांगलादेशातील पशुखाद्य उद्योगसह पशुपालक शेतकरीही अडचणीत आलेत.
सोयापेंड निर्यात थांबविण्याची मागणी  Demand to stop soybean exports
सोयापेंड निर्यात थांबविण्याची मागणी  Demand to stop soybean exports

पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यानंतर बांगलादेशातून अर्जेंटिनानंतर सर्वाधिक आयात होत आहे. मात्र यामुळे बांगलादेशातील सोयापेंडचे दर १० ते १२ टका (टका बांगलादेशी चलन आहे) प्रति किलोवरून ५३ ते ५५ टकावर गेल्याने पशुखाद्य उद्योगसह पशुपालक शेतकरीही अडचणीत आले आहेत. त्यामुळे पशुखाद्य उद्योगाने बांगलादेश सरकारकडे सोयापेंड निर्यातीवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.  बांगलादेशात पशुआहारात तब्बल २५ ते ३५ टक्के सोयापेंडचा वापर केला जातो. बांगलादेश सरकारने अलीकडेच सोयापेंड निर्यातीसाठी परवनागी दिली आहे. त्यातच भारतातून जनुकीय सुधारित सोयापेंडला मागणी वाढल्याने आणि निर्यातीसाठी लागणारा कमी कालावधी तसेच कमी खर्च यामुळे भारतात निर्यात वाढली आहे. मात्र त्याचा विपरीत परिणाम बांगलादेशातील उद्योगावर होत आहे. त्यामुळे येथील पशुखाद्यनिर्मिती उद्योगाच्या संघटनेने सरकारकडे निर्यातीवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.  भारतातून सोयापेंडला मागणी वाढल्याने देशातील आयातदार, प्रक्रियादार आयातीचे करार करण्यास इच्छुक आहेत आणि बांगलादेश सरकारही त्यास सहमत आहे. मात्र येथील पशुखाद्य निर्मिती संघटनांचे म्हणणे आहे, की निर्यात वाढत राहिल्यास दर मोठ्या प्रमाणात वाढतील आणि पशुपालक, पोल्ट्री आणि दूध उत्पादकांचा खर्च वाढून याचा थेट परिणाम बांगलादेशातील ग्राहकांवर होईल. 

निर्यातीमुळे साठेबाजीला खतपाणी  पशुखाद्यनिर्मिती उद्योगाच्या संघटनेने म्हटले आहे, सरकारने सोयापेंड निर्यातीला परवानगी देताच सोयापेंड उत्पादकांनी दर वाढविले आहेत. आता सोयापेंडचा दर हा १० ते १२ टकावरून ५३ ते ५४ टकांवर पोहोचला आहे. यामुळे पशुखाद्य उद्योगासोबतच शेतकरीही संकटात सापडले आहेत. तसेच दुग्धोत्पादक शेतकऱ्यांचाही खर्च वाढणार आहे. सोयाबीन प्रक्रिया उद्योगांचा पुरवठा करून करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काळात सोयापेंडचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

बांगलादेशातील उत्पादनाची स्थिती  बांगलादेशात सोयाबीन उत्पादन खूपच कमी होते. ब्राझील आणि अर्जेंटिनातून जनुकीय सुधारित सोयाबीनची आयात करून सोयातेल आणि सोयापेंडची निर्मिती केली जाते. बांगलादेशात सोयापेंडची मागणी आणि वापर वाढल्याने सोयापेंडची तशी निर्यात होत नाही. परंतु भारतातून पहिल्यांदाच जणुकीय सुधारित सोयापेंडला मागणी वाढल्याने बांगलादेशातून निर्यातीचे करार होत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत बांगलादेशातून १.२५ लाख टन सोयापेंड निर्यातीचे करार भारताबरोबर झाले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com