पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी

पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी

अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही अंतिम तारीख असून, ही मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.  याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिल्ह्यात आजवर झालेला अपुरा पाऊस, मागील वर्षाचा दुष्काळ, अनियमित कर्जपुरवठा होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. तसेच, विमा भरताना जो सातबारा, नमुना आठ ‘अ’ लागतो तो तलाठ्याजवळील असला पाहिजे, ही सक्ती करू नये. कारण, बऱ्याच गावांत तलाठी येत नाहीत. त्यांचे राहणे शहराच्या ठिकाणी असते आणि शेतकऱ्यांना सातबारा काढण्यासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागते. त्यांचे शेतातील कामे तशीच राहतात. या कामांसाठी मजूर सांगावे लागतात. ही मजुरी देण्याची अनेकांची सोय नाही. अशा परिस्थितीत थोडा वेळ आणखी वाढून मिळाला, तर शेतकऱ्यांना पीकविमा भरणे सोयीचे होईल, असे  संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com