परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, या मागणीसाठी सोमवारी (ता.२१) स्वाभिमानी शेतकरी संघटटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानग्रस्त पिके हातात घेऊन निदर्शने करण्यात आली.
यंदाच्या खरिपात सुरुवातीला मूग, उडदाचे पावसामुळे नुकसान झाले. त्यानंतर आता अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तूर,ज्वारी आदी पिकांचे खूप मोठे नुकसान झाले. उसाचे पीक भुईसपाट झाले आहे. सर्वच पिकांचे ३३ टक्के पेक्षी अधिक नुकसान झाले आहे.
त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटींग, केशव आरमळ, डिगांबर पवार, मुंजाभाऊ लोडे,हनुमान मसलकर, संतोष पोटे, बाळासाहेब घाटूळ, रामेश्वर आवरगंड, पंडित भोसले, उस्मान पठाण, जाकेर आदिंनी जिल्हाप्रशासानकडे केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.