उंबरशेत खार बंधाऱ्याला भगदाड

उंबरशेत खार बंधाऱ्याला भगदाड
उंबरशेत खार बंधाऱ्याला भगदाड

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील उंबरशेत येथील खारे पाणी अडवणाऱ्या बंधाऱ्याला भगदाड पडल्यामुळे किनाऱ्यावरील पाणी भातशेतीमध्ये घुसले. यामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

सावित्री खाडी लगतचीही उंबरशेत गावाची शेकडो एकर जमीन खारे पाणी शेतात शिरल्याने नापीक बनत आहे. भरतीचे पाणी अडविण्यासाठी आवश्यक असणारा प्रतिबंधक बांध उभारला होता. खाडी लगतच्या शेकडो एकर शेतीवर उंबरशेत, पणदेरी गावाची उपजीविका अवलंबून आहे. पाणथळ क्षेत्रामुळे येथील शेतकरी भात, पावटा, मुळा, उडीद, तूर अशी बारमाही उत्पादने घेतात. मात्र या पाण्यामुळे उत्पादन घटले, शेती ओसाड पडू लागली. त्यातच जंगली श्वापदांचा त्रास होऊ लागला. यामुळे बळिराजा मेटाकुटीला आला आहे. 

नापीक क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, उर्वरित शेतीही त्याला बळी पडणार आहे. यावर उपाययोजना म्हणून पेवे-उंबरशेत धूप प्रतिबंधक बंधारा अत्यावश्यक बनला आहे. खारभूमी विकास विभाग याकडे लक्ष देईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

उंबरशेत, कोंडगाव येथील खारभूमी बंधारे विशेष बाब म्हणून घेणार असल्याचे खारभूमी प्राधिकरण व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गतवर्षी मुंबई येथे सांगितले होते. त्यामुळे परिसरातील उर्वरित भात शेती वाचण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र यावर अद्यापही ठोस काही झाले नाही. त्यामुळे पुन्हा मंत्री व अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे ग्रामस्थ नरेश बोर्ले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com