औसा तालुक्यात संततधारेमुळे उडीद,मूग पिकांचं मातेरं

औसा, जि. लातूर : गेल्या महिन्यात पंधरा दिवस पडणाऱ्या भुरभुर पावसाने काढणीस आलेल्या उडीद आणि मुगाचे मातेरे केले. यातून केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
औसा, जि. लातूर  :गेल्या महिन्यात पंधरा दिवस पडणाऱ्या भुरभुर पावसाने काढणीस आलेल्या उडीद आणि मुगाचे मातेरे केले. यातून केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
औसा, जि. लातूर  :गेल्या महिन्यात पंधरा दिवस पडणाऱ्या भुरभुर पावसाने काढणीस आलेल्या उडीद आणि मुगाचे मातेरे केले. यातून केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

औसा, जि. लातूर  : खरिपातील अल्पकाळात उत्पादन देणारे पीक म्हणून उडीद आणि मुगाची पेरणी जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकरी केली. यंदा जेमतेम पावसावर ही पिके चांगली आली. भरघोस वाढ आणि भरपूर फळधारणा असल्याने शेतकरी सुखावला. तोच गेल्या महिन्यात पंधरा दिवस पडणाऱ्या भुरभुर पावसाने काढणीस आलेल्या या दोन्ही पिकांचे मातेरे केले. यातून केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. 

शेतकऱ्यांच्या या संकट काळात सरकारने मदतीचा हात द्यावा, यासाठी औसा येथील आमदार अभिमन्यू पवार, लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड यांनी नुकसानीच्या पंचनाम्यांची मागणी केली आहे. तालुक्याचे खरिपाचे एकूण क्षेत्र १ लाख ११ हजार हेक्टरच्यावर आहे. यामध्ये ६० ते ७० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. यंदा तालुक्यात मूग २५ हजार ८ तर, उडीद २५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरला आहे. 

मृगात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कमी दिवसांत येणारे पीक म्हणून मूग, उडदाची लागवड केली. उडीद, मूग घेण्याचे अजून एक कारण म्हणजे घरात लागणारी डाळ. याच उत्पादनातून स्वस्तात होते आणि पीक लवकर निघत असल्याने रब्बीचे पीक लवकर पेरता येते.  त्यामुळे दोन हंगामातील पिकांचा फायदा शेतकऱ्यांना करून घेता येतो. म्हणून शेतकऱ्यांनी मूग, उडदाची पेरणी करण्याकडे कल दिला.

पिकांची काढणीही परवडेना

यंदा शेंगा पक्व होताना सतत पडणाऱ्या भुरभुरीने पानावर व शेंगावर करपा आला. अनेक दाण्यांना शेंगांमध्येच कोंब फुटले. दाणे काळपट पडून अडकन जास्त झाल्याने या पिकाची काढणीही आता शेतकऱ्यांना परवडत नसल्याची स्थिती आहे. काळा पडलेला माल बाजारात घेतला जात नाही. घेतला तर तो मातीमोल भावाने घेतला जात असल्याने शेतकरी धास्तवाला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

अडीच एकरवर मुगाची लागवड केली होती. परंतु, सतत पडणाऱ्या रिपरिपीने मुगाचे पार मातेरे झाले आहे. आता काढणीचाही खर्च निघत नसल्याने पुढे काय करावे, हा प्रश्न आहे. सरकारने तातडीने नुकसानभरपाई द्यावी. - शफी शेख, शेतकरी, औसा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com