नाशिक जिल्ह्यात संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन

नाशिक जिल्ह्यात संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन
नाशिक जिल्ह्यात संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी संगणक परिचालकांना आय. टी. महामंडळात सामावून घेण्याचे दिलेली आश्वासने अद्यापही पूर्ण झालेली नाही. यामुळे राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर ‘आपले सरकार’ प्रकल्पात काम करणाऱ्या संगणक परिचालकांनी नाशिक जिल्ह्यात विविध तालुक्यांत पंचायत समितीसमोर शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत नुकतेच धरणे आंदोलन केले.  संगणक परिचालकांच्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे. याबाबत बागलाण, येवला, पेठ, नाशिक, इगतपुरी यांसह विविध ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी संबंधित तालुक्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ सालापासून ‘संग्राम’ व सध्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्र या प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायती मधील संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करीत आहेत. 

शासनाने संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, १५ हजार रुपये किमान वेतन द्यावे, २०१७ पासून थकीत असलेले मानधन तत्काळ घ्यावे, यांसह विविध मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शासनविरोधात आमचा लढा सुरूच राहील, आता एक दिवस धरणे आंदोलन झाले, आता पुढील आंदोलन पुन्हा मुंबईत करू.  - राकेश देशमुख, उपध्यक्ष, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com