फळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता कमी करण्यासाठी तंत्रज्ञान वापरले जाते. हे वापरताना तापमान व प्रक्रिया ही वेळ या बाबींचे विशेष नियंत्रण करावे लागते. तरच अपेक्षित गुणवत्ता मिळते.
मागील भागात आपण भाजीपाला व फळे यांचे निर्जलीकरण (डीहायड्रेशन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स) याबाबत प्राथमिक माहिती घेतली. फळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता (Moisture) कमी करण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. ते वापरताना आपणास तापमान व प्रक्रिया ही वेळ या बाबींचे विशेष नियंत्रण करावे लागते. अन्यथा अपेक्षित असलेले गुणवत्तेचे निर्जलीकरण (Dehydration Quality) मिळू शकत नाही. प्रक्रियेचे तापमान व वेळ या बाबी फळे व पालेभाज्या यांचा प्रकार यावर अवलंबून असते. निर्जलीकरण केलेल्या मालाची गुणवत्ता मानके (Quality Parameter) म्हणजे त्याचा रंग, चव, गंध, आणि पोषक मूल्ये (Nutritional Facts) ही योग्य पद्धतीने नियंत्रित केलेली असावीत. ताजा भाजीपाला व फळे यांच्यानुसारच हे घटक एकसारखेच असावेत ही बाजारपेठेची अपेक्षा असते. निर्जलीकरण तंत्र काय आहे? आपण या तंत्राद्वारे खालील फळे व भाज्यांवर प्रक्रिया करू शकतो. भाजीपाला मेथी, कोथिंबीर, पुदिना, गाजर, भेंडी, वांगी, शेवगा, बीट, कोबी, फ्लॉवर, गवार, लसूण, मशरूम कांदा टोमॅटो आदी. फळे केळी, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, बेदाणे, सफरचंद, अंजीर, चिकू, डाळिंब, संत्रा, मोसंबी अंजीर आदी. गुणवत्ता बाबी रंग(Colour) हिरव्या पालेभाज्यांच्या निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये नैसर्गिक रंग नियंत्रित करणे हे एक कौशल्याचे काम आहे. हा रंग नियंत्रित करण्यासाठी प्रक्रियेचे तापमान आणि वेळ नियंत्रित करणे गरजेचे आहे. प्रक्रिया तापमानावर योग्य असे नियंत्रण वेळेवर न करता आल्यास तयार होणाऱ्या उत्पादनाचा रंग काळसर तांबूस (Burned Bkackish) तसेच जळकट (Burned) होतो. त्यामुळे मालाचे बाजारपेठेतील गुणवत्ता मूल्य कमी होऊन मागणी व दर यावर परिणाम होऊ शकतो. गंध (Aroma) हा देखील फार महत्त्वाचा मानक (Parameter) आहे. गंध नियंत्रित करण्यासाठी प्रक्रियेचे तापमान अत्यंत महत्त्वाचे आहे. तसे न झाल्यास म्हणजेच नियंत्रित तापमानापेक्षा जास्त तापमानास प्रक्रिया केल्यास पाण्याच्या बाष्पीभवनाने यातील सुगंधी संयुगे (ॲरोमॅटिक कंपाऊंडस) व सुगंधी तेल यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तयार होणाऱ्या उत्पादनाला अपेक्षेपेक्षा नैसर्गिक गंधाचे प्रमाण कमी होऊ शकते. अशा उत्पादनाची बाजारपेठेतील मागणी कमी होऊ शकते. चव (Taste) हिरव्या पालेभाज्या व फळे यांच्यातील चव ही प्रक्रियेचे तापमान तसेच वेळ यावर देखील अवलंबून आहे. या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवले असता तयार होणाऱ्या उत्पादनाला नैसर्गिक चव असते. ती बाजारपेठेतील गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून अपेक्षित असते. जर तयार झालेल्या उत्पादनाला नैसर्गिक रंग, गंध, चव असेल तर बाजारपेठेतील या उत्पादनाची गुणवत्ता उच्चतम दर्जाची मानली जाते. अशा उत्पादनाला मागणी वाढते व दरही चांगले मिळतात. पोषक मुल्ये (Nutritoinal Facts) या प्रक्रियेमध्ये निर्जलीकरण केलेल्या उत्पादनाला पोषक मूल्य असणे देखील महत्त्वाचे ठरते. यामध्ये वेगवेगळ्या तापमानास प्रक्रिया करून उत्पादनाची पोषक मूल्ये जपावी लागतात. त्यामुळे प्रक्रिया नियंत्रित तापमानाला करावी लागते. ज्या उत्पादनाची पोषकमूल्ये नैसर्गिक शेतमालासारखी असतात त्यांना बाजारपेठेत योग्य दर मिळतो. छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या उद्योजकांसाठी निर्जलीकरण प्रचलित पद्धती- सावलीत सुकवणे (पारंपारिक पद्धत) ही पद्धत पारंपारिक म्हणून मानली जाते. यात भाजीपाला सावलीत सुकविला जातो. या प्रक्रियेची पूर्वतयारी पुढीलप्रमाणे करावी लागते.
अशा रितीने तयार झालेले उत्पादन स्वच्छ अशा फूड ग्रेड (Food Grade) सीलबंद पिशवीमध्ये हवाबंद (Airtight Sealed) पद्धतीने पॅकिंग करून साठवणूक करता येऊ शकते. बाजारपेठेत मागणीनुसार विक्रीसाठी ते उपलब्ध करता येते. या पद्धतीत अन्य पद्धतींपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने याचा फार कमी वेळा विचार केला जातो. व्यावसायिक पद्धती आपण काही व्यावसायिक पद्धतींचा अभ्यास करू सोलर ड्राइंग (Solar Drying)
प्रक्रियेची पूर्वतयारी
यापुढील प्रक्रिया पध्दत आपण पुढील भागात अभ्यासूयात.
संपर्क- राजेंद्र वारे, ९८८१४९५१४७ (लेखक प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन व कायदेशीर बाबी इ. विषयांतील तज्ञ आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.