ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला अडचण

खानदेशात सोयाबीन मळणीला ढंगाची अडचण
खानदेशात सोयाबीन मळणीला ढंगाची अडचण

जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने सोयाबीन मळणीवर परिणाम झाला आहे. पीक कापणीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी कापणी पूर्ण झाली आहे. परंतु दाणे पुरेसे कोरडे नसल्याने मळणीला अडचणी येत आहेत.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा भागात अधिकची पेरणी झाली होती. धुळे जिल्ह्यात शिरपुरात अधिक पेरणी झाली होती. नंदुरबारात शहादा, तळोदा व नंदुरबार तालुक्‍यांत अधिक पेरणी झाली आहे. पिकाला हव्या त्या वेळी पावसाचे पाणी न मिळाल्याने हवे तसे उत्पादन येत नसल्याची स्थिती आहे. परंतु आता हाती आलेल्या पिकाची मळणी करण्यापूर्वी प्रतिकूल वातावरण आहे. तळोदा भागात काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मळणी झाली आहे.

पावसाच्या आगमनाबाबत अंदाज येत असल्याने शेतकऱ्यांनी कापणी थांबविली आहे. कापणीनंतर पाऊस आल्यास नुकसान अधिक होते. दाणे फुगून फुटतात. त्यांचा दर्जा घसरतो. तसेच ते अंकुरतात. कापणी झालेले सोयाबीन वाळण्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाशाचे वातावरण नाही. त्यामुळे दाणे कोरडे होत नसल्याची स्थिती आहे. दाणे पक्व नाहीत म्हणून यंत्रचालक मळणी करू देत नाहीत. कारण त्यामुळे मळणी यंत्राचे नुकसान होण्याची शक्‍यता असते. यामुळे सोयाबीन मळणी लांबत असून, सुरवातीच्या बऱ्यापैकी असलेल्या दरांचा लाभ शेतकऱ्यांना होत नसल्याची स्थिती आहे. खानदेशात यंदा सोयाबीनची पेरणी काहीशी वाढली होती. एकूण क्षेत्र सुमारे ४० हजार हेक्‍टर असल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com