राज्यात थेट भाजीपाला, फळे विक्रीत घट

राज्यातील काही बाजार समित्या बंद केल्या होत्या. त्या ‘अॅग्रोवन’च्या पाठपुराव्यामुळे पुन्हा सुरु होत आहेत, हा शेतकरी, भाजीपाला उत्पादकांना दिलासा आहे. शेतकऱ्यांना मोठ्या बाजार समिती तसेच थेट विक्रीतील अडचणी दूर व्हाव्यात. - संतोष भापकर, अध्यक्ष, संपुर्ण शेतकरी गट, गुंडेगाव ता. नगर, जि. नगर
farmer market
farmer market

नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून (ता.११) राज्यातील प्रमुख बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे राज्यात दररोज होणाऱ्या फळे, भाजीपाल्याच्या विक्रीत सुमारे एक हजार टनांची घट झाल्याचे गेल्या चार दिवसात स्पष्ट झाले. ‘अॅग्रोवन’च्या पुढाकारामुळे प्रमुख बाजार समित्यांत भाजीपाला, फळांची खरेदी- विक्री सुरु होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.  दरम्यान, बंदच्या काळात गेल्या पंधरा दिवसात शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांच्या पुढाकारातून सुमारे बत्तीस हजार टन भाजीपाला, फळांची विक्री झाली.  कोरोना संसर्गामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय झाला. कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता भाजीपाला बाजार बंद केल्याचा विक्रीवर परिणाम झाल्याचे कृषी विभागाच्या आढाव्यात स्पष्ट झाले. गेल्या पंधरा दिवसात दर दिवसाला पावने दोन हजार ते अडीच हजार टन भाजीपाला, फळांची विक्री होत होती. मात्र चार दिवसांत बाजार समित्या बंद असल्याच्या काळात भाजीपाला, फळांची विक्री एक हजार टनाच्या आता आल्याचे स्पष्ट झाले.  आजपासून मुंबईसह अन्य काही बाजार समित्या सुरु होणार असल्याने पुन्हा फळे, भाजीपाल्याची विक्री सुरळीत होण्याची आशा आहे.  पंधरा दिवसातील फळे, भाजीपाल्याची विभागनिहाय विक्री (क्विंटलमध्ये) ठाणे ः १९,४३५, कोल्हापुर ः ५८,२३६, नाशिक ः ३७,९००, पुणे ः ७३,२००, औरंगाबाद ः ८,६७५, लातूर ः २४,६४०, अमरावती ः ७१,५००, नागपूर ः २७,५७५  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com