जळगावातील प्रकल्पांना निधी दिला नसल्याने निराशा

जळगावातील प्रकल्पांना निधी दिला नसल्याने निराशा
जळगावातील प्रकल्पांना निधी दिला नसल्याने निराशा

जळगाव ः जिल्ह्यातील शेतीला सिंचनाचे ठोस स्राेत म्हणून चर्चेत असलेल्या तापी नदीवरील महाकाय जलपुनर्भरण व गिरणा नदीरवरील बलून बंधारे प्रकल्पासाठी निधीची ठोस तरतूद झालेली नसल्याची माहिती आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. 

तापी नदीवर मध्य प्रदेशातील खारिया गुटी येथे जलपुनर्भरण प्रकल्पासंबंधी केंद्र सरकारने कार्यक्रम हाती घेतला आहे. सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये या प्रकल्पास लागणार आहेत. हा प्रकल्प केंद्रीय प्रकल्प म्हणून जाहीर झाला असून, कामास सुरवातीचे सर्वेक्षणही जवळपास पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाबाबत निधीची तरतूद अपेक्षित होती, परंतु कुठलीही ठोस तरतूद झालेली नसल्याची माहिती आहे. यावल, रावेर, चोपडा, विदर्भातील अंजनगाव सुर्जीपर्यंत या प्रकल्पाचा लाभ मिळू शकणार आहे. 

तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरला लाभ होईल. सातपुडा पर्वतातील बझाडा क्षेत्रात पाणी जिरून तापी नदीपर्यंतच्या भागात यावल, रावेर व चोपडा तालुक्‍यात जलपुनर्भरण होईल, असा दावा तज्ज्ञ करीत आहेत, परंतु या प्रकल्पाला प्रत्यक्षात सुरवात करण्यासंबंधी कुठल्याही हालचाली झालेल्या नसल्याचे सांगण्यात आले. 

गिरणा नदीवर मेहुणबारे (ता. चाळीसगाव), भडगाव, कानळदा (ता. जळगाव) आदी सात बलून बंधारे प्रस्तावित आहेत. या बंधाऱ्यांनाही केंद्रीय प्रकल्प म्हणून मंजुरी मिळाली आहे. सर्व मंजुऱ्या मिळाल्या असून, निधीची तरतूद या अर्थसंकल्पात होईल, अशी अपेक्षा होती. ७११ कोटी रुपये निधी या प्रकल्पास हवा आहे. सुमारे चार हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली राहील, तसेच अनेक गावांचा पाणीप्रश्‍नही या प्रकल्पामुळे सुटणार आहे, परंतु निधी नसल्याने काम केव्हा सुरू होईल, हा प्रश्‍न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com