राधानगरीतून दुुप्पट विसर्ग; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होणार

राधानगरीतून दुुप्पट विसर्ग; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होणार
राधानगरीतून दुुप्पट विसर्ग; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होणार

कोल्हापूर  : राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे रात्री पावणे दहा वाजता उघडल्याने 7400 असलेला विसर्ग तब्बल 14 हजार 540 वर पोहोचला. तसेच कोयना धरणाचा विसर्ग ही वाढवल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली पुराचा विळखा रात्रीत आणखी घट्ट झाला आहे

 बंद असलेली राधानगरी ते स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होणार आहे. राधानगरी धरणातून दिवसभरात केवळ 7400 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता. मात्र पावणेदहाच्या सुमारास आणखीन स्वयंचलित दरवाजे उघडल्याने विसर्गामध्ये दुप्पट वाढ झाली. याचा परिणाम पूर परिस्थिती आणखी गंभीर बनल्यावर झाला. अशा परिस्थितीमध्ये अतिवृष्टी ही सुरूच होती. एकीकडे मदत कार्यात येणारे अडथळे आणि दुसरीकडे वाढत जाणारा विसर्ग आणि होत असणारी अतिवृष्टी यामुळे कोल्हापूरकरांची भीती वाढण्यात आणखी  भर पडली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आठ आणि नऊ ऑगस्टला पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. परिणामी पूर परिस्थिती आणखी भयावह होत असल्याचे आज रात्री स्पष्ट झाले. धरणक्षेत्रातही वाढलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणाला धोका होऊ नये म्हणून स्वयंचलित दरवाजे उघडले जात आहेत. त्याचा फटका थेट पंचगंगा नदी परिसरातील गावांना बसत आहे. आज दिवसभरात काही प्रमाणात पावसाने उघडीप दिल्यामुळे आता पूर परिस्थिती आटोक्यात येईल असा अंदाज होता. मात्र धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीच्या काही तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे कोल्हापूर आणखी महापुराच्या विळख्यात  अडकत असल्याचे स्पष्ट झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com