हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

तालुक्यातील हतनूर धरणात पाण्याचा साठा वाढल्याने हतनूर धरणाचे ४१ दरवाजे बुधवारी (ता. ८) पूर्ण उघडण्यात आले. धरणातून ८२ हजार २७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Discharge of water from Hatnur dam started
Discharge of water from Hatnur dam started

भुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात पाण्याचा साठा वाढल्याने हतनूर धरणाचे ४१ दरवाजे बुधवारी (ता. ८) पूर्ण उघडण्यात आले. धरणातून ८२ हजार २७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गुरुवारी सकाळी (ता. ९) धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू होता.

तालुक्यात मागील १५ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. हतनूर धरण क्षेत्रात मंगळवारी (ता. ७) सकाळपासून दमदार पाऊस झाला. यामुळे हतनूर धरण पूर्ण भरल्याने धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास तापी नदीपात्रात ८२ हजार २७८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. परिणामी, तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. काही तासांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हतनूर धरणाच्या लगतच्या गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रात कुणीही गुरेढोरे सोडू नये, कोणीही नदीपात्रात जाऊ नये, नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 पूर्णा नदीतून पाण्याचा विसर्ग सोडणार  पूर्णा नदीतून सुमारे चार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग बुधवारी सायंकाळी सात ते रात्री नऊच्या दरम्यान सोडण्यात येणार आहे. त्यामुळे हतनूर धरणाखाली नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com