गिरणा धरणातून रब्बीसाठी आवर्तन सोडावे

गिरणा धरणातून रब्बीसाठी  पाणी  सोडावे
गिरणा धरणातून रब्बीसाठी पाणी सोडावे

जळगाव ः गिरणा धरणात पाणी असताना अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे रब्बी हंगामासाठी अद्याप पाणी सोडलेले नाही. नोव्हेंबरपासून रब्बीचा हंगाम सुरू होतो. आता दोन महिने उलटले आहेत. याबाबत त्वरित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून दोन दिवसांत रब्बीसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात येणारे आवर्तन तब्बल महिनाभर उशिरा येणार आहे. हे आवर्तन नोव्हेंबरमध्ये अपेक्षित होते. रब्बीचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होतो. मात्र, जानेवारी उजाडण्यात आला तरी अद्याप पाणी नाही. सदर रब्बी हंगामासाठीचे आवर्तन हे फेब्रुवारीपर्यंत असेल. त्यानंतर उन्हाळी हंगाम सुरू होतो. मग दोन महिन्यांत रब्बीचे कोणते पीक येणार आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गिरणातून तातडीने आवर्तन सोडण्याचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना अधिकार आहेत, त्यांनी पाणी आवर्तन सोडण्याचे निर्देश गिरणा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी शेतकरीवर्ग करीत आहे.  अनेर धरणातून देणार रब्बीसाठी पाणी  शिरपूर (जि. धुळे) येथे अनेर मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाणी देण्यात येणार असून त्यासाठीचे पहिले आवर्तन वीस जानेवारीला सोडण्यात येणार आहे. अनेर धरणाच्या उजव्या कालव्यातून शिरपूर तालुक्‍यातील हिसाळे, तरडी, तोंदे, भावेर, होळनाथे, अजंदे, घोडीसगाव, भोरटेक, मांजरोद, पीळोदे, बभळाज आदी शिवारातील शेतीला लाभ होतो. तर डाव्या कालव्यातून चोपडा तालुक्‍यातील शिकावल, गणपूर, मराठे, लासूर शिवारातील जमिनीस पाणीपुरवठा करण्यात येतो. या कालावधीत फेब्रुवारीअखेरपर्यंत चार आवर्तने सोडण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com