नागपूर विभागात नुकसानीचा अहवाल निरंक !

नागपूर विभागात नुकसानीचा अहवाल निरंक
नागपूर विभागात नुकसानीचा अहवाल निरंक

नागपूर  ः नागपूर विभागात अवकाळी पाऊस, गारपीट व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल पाठविण्याचे आदेश मंत्रालयातून देण्यात आले. रात्री आदेश मिळताच सोमवारी (ता. २) सकाळीच निरंक अहवाल पाठविण्यात आला. त्यामुळे पंचनाम्याबाबत साशंकता व्यक्‍त होत आहे.  विदर्भात गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वारा वाहता आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, लाखोरी अशा सर्वच पिकांना याचा फटका बसला. भंडारा, गोंदियासह नागपूर जिल्हयातही यामुळे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात. मात्र महसूल प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याने नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. रविवारी (ता.१) रात्री देखील अवकाळी पाऊस, गारपीट झाली. त्याचाही फटका पिकांना बसला. रविवारी रात्रीच सर्वेक्षण, पंचनाम्याचे आदेश मंत्रालयस्तरावरुन देण्यात आले. व्हॉटसअप, एस.एम.एस.चा वापर याकामी करण्यात आला.  त्यानंतर अवघ्या दोन तासात नुकसान अहवाल पाठविण्यास सांगण्यात आले. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातून त्यानंतर तत्काळ अहवाल यंत्रणेला प्राप्त झाले. परंतु सर्वेक्षण आणि पंचनाम्याची कारवाई इतक्‍या तत्काळ कशी पूर्णत्वास गेली? याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.  एकाच दिवसात अहवाल तयार  नुकसान सर्वेक्षण व पंचनाम्याकरिता एका तलाठ्यास किमान एक ते दोन दिवस लागतात. याठिकाणी मात्र रविवारच्या नुकसानीचा सोमवारी सकाळीच अहवाल देण्यात आला. हा अहवालदेखील निरंक असा असल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com