जळगाव जिल्ह्यात पीककर्जाचे उद्दीष्ट ४० टक्केही पूर्ण नाही

जिल्ह्यात पीककर्जाचे केवळ ४० टक्के वाटप
जिल्ह्यात पीककर्जाचे केवळ ४० टक्के वाटप

जळगाव : जिल्ह्यात पीककर्ज वितरणाचे उद्दीष्ट अद्याप ४० टक्केही पूर्ण झालेले नाही. कर्जमाफीचे लाभार्थी नव्या पीककर्जापासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांना कर्जासाठी अजूनही तालुक्‍याच्या ठिकाणी पायपीट करावी लागत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने नियमित कर्जदारांची खरीप पीककर्जाची अधिकाधिक प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असून, या बॅंकेने समाधानकारक काम केले आहे. जिल्ह्यात एकूण सुमारे १६५० कोटी रुपये रक्कम पीककर्ज म्हणून वितरित करायची आहे. त्यापैकी जिल्हा बॅंकेला सुमारे १ हजार कोटी रुपये कर्ज म्हणून द्यायची आहे. या बॅंकेने नियमित कर्जदारांना ७० टक्‍क्‍यांवर पीककर्ज वितरण केले. तर कर्जमाफीच्या लाभार्थ्यांनाही पीककर्ज वितरण सुरू आहे. सोसायट्यांना त्याबाबत तातडीने कार्यवाहीच्या सूचना बॅंकेने दिल्याची माहिती मिळाली.

कर्जमाफीच्या लाभार्थींना कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू आहे. ग्रामीण भागातील शाखांमध्ये कर्ज मिळणार नाही, जिल्हास्तरावर कृषी विकास शाखेत जा, असे या बॅंकांचे ग्रामीण भागातील अधिकारी सांगत आहेत. यामुळे कर्जमाफीचे लाभार्थी त्याठिकाणी चकरा मारीत आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ४० टक्केही पीककर्ज वितरण केलेले नाही. कर्ज का देत नाहीत, हे लेखी कळवायलाही या बॅंका तयार नाहीत.

कर्ज नीलच्या दाखल्यांच्या तक्रारी जळगाव जिल्हा बॅंकेकडून कर्ज घेतलेल्या कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना सोसायट्यांकडून कर्ज फेडल्याचे दाखले मिळण्यात अडचणी आहेत. सोसायट्या दाखला देत नसल्याने नवे पीककर्ज घेताना अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com