नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर बँकांमार्फत मदत वर्ग करण्यात येत असून, जिल्ह्यात शुक्रवार (ता. १३) अखेर ९४.४६ टक्के मदत देण्यात आली आहे.
आत्तापर्यंत १७१ कोटी ४६ लाख रुपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बागलाण, दिंडोरी, देवळा, त्र्यंबकेश्वर, चांदवड, सिन्नर या तालुक्यांमध्ये १०० टक्के मदत वितरित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. आत्तापर्यंत मालेगाव, नांदगाव, नाशिक आणि पेठ तालुक्यांतील ९९ टक्के शेतकऱ्यांना मदत पोचली. तर काही शेतकऱ्यांना मदत देणे बाकी आहे.
उर्वरित कळवण, सुरगाणा, इगतपुरी, निफाड या तालुक्यांमध्ये तुलनेने कमी वाटप झाले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या वादळी वाऱ्यासह आलेल्या अतिवृष्टीमुळे पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले. प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ६०० कोटींची मदत मागण्यात आली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांची मदत प्राप्त झाली. लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार झाल्यानंतर आता प्रत्यक्ष मदत थेट बँकेच्या माध्यमातून वर्ग करण्यात येत आहे.
मदत वितरणाची स्थिती अशी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.