जिल्हा बॅंकांनी ठोठावला राज्य बॅंकेचा दरवाजा

सोलापूर : ‘कोरोना’मुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बॅंकांनी उद्दिष्टानुसार कर्जवाटप करावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. पात्र असतानाही कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर फौजदारी दाखल करण्याचा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्ज वाटपाच्या उद्दिष्टासाठी जिल्हा बॅंकांनी राज्य बॅंकेचा दरवाजा ठोठावला आहे.
bank state coperative
bank state coperative

सोलापूर : ‘कोरोना’मुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बॅंकांनी उद्दिष्टानुसार कर्जवाटप करावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. पात्र असतानाही कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर फौजदारी दाखल करण्याचा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्ज वाटपाच्या उद्दिष्टासाठी जिल्हा बॅंकांनी राज्य बॅंकेचा दरवाजा ठोठावला आहे. आत्तापर्यंत आठ जिल्हा बॅंकांना एक हजार ४८ कोटींचे अर्थसाह्य राज्य बॅंकेने केले आहे.

कोरोना आणि लॉकडाउनच्या पेचात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी व शेतीपूरक उद्योगांसाठी नाबार्डने ‘तरलता (लिक्‍विडिटी) लोन’ ही योजना काढली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य बॅंक जिल्हा बॅंकांना अर्थसाह्य करीत आहे. राज्य सहकारी बॅंकेने आतापर्यंत पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, उस्मानाबाद, अकोला, गडचिरोली व यवतमाळ या आठ बॅंकांना अर्थसाह्य केले आहे.

दरम्यान, राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने खरीप हंगामासाठी राज्यातील २९ जिल्हा बॅंकांना १३ हजार ३९५ कोटी ६० लाखांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. आत्तापर्यंत बहुतांश बॅंकांनी ६० टक्‍क्‍यांपर्यंत कर्जवाटप केले असून काही बॅंकांनी उद्दिष्टाच्या परिपूर्तीसाठी राज्य बॅंकेकडे धाव घेतली आहे. बहुतांश जिल्हा बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांनी अद्याप रिझर्व्ह बॅंकेच्या नियमावलीवर बोट ठेवत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जवाटप नाकारल्याचे चित्र संबंध राज्यात दिसत आहे.

या जिल्हा बॅंकांनी घेतली मदत पुणे जिल्हा बॅंकेने १४३ कोटी, कोल्हापूर जिल्हा बॅंकेने १०७ कोटी, सांगली जिल्हा बॅंक २२१ कोटी, नाशिक जिल्हा बॅंक ४३ कोटी, उस्मानाबाद जिल्हा बॅंक १३५ कोटी ५० लाख, अकोला जिल्हा बॅंक २४० कोटी, गडचिरोली जिल्हा बॅंकेने २१.११ कोटी; तर यवतमाळ जिल्हा बॅंकेने १३७ कोटी ७७ लाख रुपयांचे अर्थसाह्य राज्य सहकारी बॅंकेकडून घेतले आहे. आणखी काही बॅंकांनीही राज्य बॅंकेकडे कर्जाची मागणी केली आहे. राज्य बॅंकेने ठाणे, मुंबई, वर्धा बॅंक वगळता उर्वरित २८ जिल्हा बॅंकांना आठ हजार २०५ कोटी ६० लाखांची कर्जमर्यादा मंजूर केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने खरिपासाठी आठ जिल्हा बॅंकांना आत्तापर्यंत एक हजार ४८ कोटींहून अधिक रुपयांचे अर्थसाह्य केले आहे. तत्पूर्वी, मागील वर्षी तीन हजार कोटींचे अर्थसाह्य केले होते. त्यातून नाशिक जिल्हा बॅंकेकडे साडेपाचशे कोटी रुपये थकले असून, आणखी काही बॅंकांकडून येणे बाकी आहे. - डॉ. ए. आर. देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी बॅंक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com