अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का वाढवा ः शैलेश नवाल

अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का वाढवा ः शैलेश नवाल
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का वाढवा ः शैलेश नवाल

अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेबाबत तक्रारनिवारणाकरिता प्रत्येक तालुक्यात समिती गठित करण्यात आली असून, समितीने वेळोवेळी बैठका घेऊन तक्रारींचे निवारण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. त्याचप्रमाणे खरीप कर्ज वाटपाचे प्रमाण जुलैअखेरपर्यंत ५५ टक्क्यांहून अधिक करण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. नवाल यांनी पीककर्ज व विविध योजनांचा आढावा घेतला, त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. शेतकरी सन्मान योजनेत बऱ्याच कर्ज खात्यांवर अपुरी माहिती, चुकीची माहिती, यामुळे प्रक्रिया होऊ शकली नाही. याप्रकरणी प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात समिती गठित करण्यात आली आहे. सहायक निबंधक (सहकारी संस्था) हे समितीचे अध्यक्ष असून, सहकारी, अग्रणी बँकेचे प्रतिनिधी, लेखापरीक्षक, सहकार अधिकारी हे सदस्य आहेत. या  समितीने नियमित बैठकांद्वारे तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. खरीप पीककर्ज वितरणाचा आढावा घेताना ते म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेतर्फे २८ टक्के, राष्ट्रीयीकृत व्यापारी बँकांतर्फे १८ टक्के व ग्रामीण बँकेतर्फे २५ टक्के कर्ज वितरण झाल्याचे दिसते. हे प्रमाण अत्यंत कमी असून, येत्या पंधरवड्यात ते ५५ टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न करावा. बँकांनी अधिकाधिक मेळावे घेऊन त्याची पूर्वप्रसिद्धीही करावी. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती ठळकपणे शाखेत मांडावी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com