अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे करा ः जिल्हाधिकारी राम

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनाम्यांसाठी ५० कुटुंबामागे एक पथक नेमण्यात आले आहे. प्रत्येक पथकात चार जणांचा समावेश असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली. 

पुणे शहर व जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकारी राम यांनी आढावा घेतला. महापालिका आयुक्त सौरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी राम म्हणाले, की शहरात तसेच ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सखल भागात पाणी साचल्याने जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ यांना पाचारण करण्यात आले होते.

नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १८ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची ५ पथके कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या मदतीप्रमाणे या आपदग्रस्तांना मदत देण्याबाबत निवडणूक आयोगाला कळवून त्यांच्या सूचनानुसार प्रशासनाच्यावतीने बाधित नागरिकांना मदत देण्यात येणार आहे. आपदग्रस्तांना तातडीने १० किलो गहू आणि १० किलो तांदूळ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रोगराई होऊ नये, यासाठी स्वच्छतेची कामे जलदगतीने करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com