अकोला ः सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करण्याची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिफारस आहे. त्यामुळे यापुढे सोयाबीन बियाणे कमी उगवणशक्तीबाबतच्या तक्रारी स्वीकारू नयेत, असे निर्देश जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हा कृषी विभागाने याबाबत शनिवारी (ता.११) संबंधितांना पत्र पाठवले आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या, कमी प्रमाणात उगवल्याबाबत याबाबत कृषी खात्याने शेतकऱ्यांकडून तक्रारी मागविल्या होत्या. शेतकऱ्यांनी शेकडोच्या संख्येत तक्रारी केल्या आहेत. यापैकी अनेक तक्रारींची तालुका निवारण समितीने तपासणी केली आहे. सोयाबीन न उगवण्याची कारणे या तपासणीदरम्यान समोर आलेली आहेत. अद्यापही काही तालुक्यात तक्रारींचा ओघ कायम आहे. मात्र आता जुलैचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. विद्यापीठाच्या शिफारशीनुसार दुसऱ्या आठवड्यापर्यंतच लागवड करता येते. त्यामुळे आता उगवणशक्तीबाबत तक्रारी स्वीकारू नये, असे पत्र पाठविण्यात आले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.