शेतकऱ्यांकडून टोल वसुली नको : राज्य कृषी विभाग करणार केंद्राला विनंती

शेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाला, दूध यासह कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून टोल वसुली करू नये असा नियम आहे. मात्र तरीही टोल वसुली होत असेल तर बाब गंभीर आहे. सध्याच्या काळात शेतकऱ्यांना आधार मिळण्याची गरज आहे. त्यामुळे टोल वसुलीबाबत मी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत बोलणार आहे. टोल वसुली होऊच नये. होत असेल तर ती तातडीने थांबली पाहिजे. - डॉ. अनिल बोंडे, माजी कृषिमंत्री
शेतकऱ्यांकडून टोल वसुली नको : राज्य कृषी विभाग करणार मागणी 
शेतकऱ्यांकडून टोल वसुली नको : राज्य कृषी विभाग करणार मागणी 

नगर : कोरोनासारख्या गंभीर संकटातही अत्यावश्यक सेवा देताना शेतकरी कसरत आहे. अशा काळात शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहनाकडून टोल वसुलीला नकोच आहे. मात्र टोलवसुलीचा विषय केंद्र सरकारच्या अंतर्गत येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या शेतकऱ्यांच्या वाहनांकडून टोलवसुली न करण्याबाबत राज्य सरकारचा कृषी विभाग विनंती करणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. तर, शेतकऱ्यांकडून टोल वसुली थांबण्याबाबत शक्य त्या बाबी करणार असल्याचे पणन व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.  याविषयी बोलताना कृषिमंत्री भुसे म्हणाले,‘‘शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. शेतमाल विक्रीची साखळी भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहोत. अडचणीवर मात करून शेतकरी शेतमाल विक्री करत आहेत. शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशा काळात शेतकऱ्यांच्या वाहनाकडून टोल वसुली नकोच आहे. मात्र हा विषय केंद्र सरकारच्या अंतर्गत येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहनांकडून लॉकडाऊनच्या काळात टोल वसुली करू नये याबाबत केंद्र सरकारला राज्याचा कृषी विभाग विनंती करणार आहे.’’  पणनमंत्री पाटील म्हणाले,‘‘सध्याच्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांना मदत करण्याच्या भूमिकेतून सरकार काम करत आहे. कठीण प्रसंगातून शेतकरी जात असताना शेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाला, शेतमाल, दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून टोल घेतला जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. याबाबतची माहिती घेऊन लॉकडाऊनच्या काळात टोलवसुली कशी बंद होईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे.’’ 

माजी माजी पणन व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले,‘‘सध्याच्या संकटकाळात प्रशासन काम करतेय, तसेच काम अत्यावश्यक सेवा देण्यासाठी शेतकरी करत आहेत. सध्याच्या काळात भाजीपाला, दूध, फळे, कडधान्य, अन्नधान्य या अत्यावश्यक गरजेच्या बाबी आहेत. या साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून अजिबात टोल वसुली होऊ नये. कारण ही वेळ नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे अत्यावश्यक वस्तू जर सगळ्यापर्यंत पोचवायच्या असतील तर खर्च कमी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सिस्टिम ठरवून देणे महत्त्वाचे आहे. अत्यावश्यक सेवेतील किमतीत साधारण तीस ते चाळीस टक्के वाढ होते. त्यात ग्राहक व शेतकरी मरतो आहे. त्याला टोलसारख्या बाबी कारणीभूत आहे. त्यामुळे टोलवसुली नको आहे.’’  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी बोलणार  शेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाला, दूध यासह कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून टोल वसुली करू नये असा नियम आहे. मात्र तरीही टोल वसुली होत असेल तर बाब गंभीर आहे. सध्याच्या काळात शेतकऱ्यांना आधार मिळण्याची गरज आहे. त्यामुळे टोल वसुलीबाबत मी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत बोलणार आहे. टोल वसुली होऊच नये. होत असेल तर ती तातडीने थांबली पाहिजे.  - डॉ. अनिल बोंडे, माजी कृषिमंत्री 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com