नांदेड : राज्य सरकारने थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडणी करण्याची घोषणा करून २४ तास उलटण्यापूर्वी जिल्ह्यात घरगुती वीज तोडण्याचे काम सुरू केले आहे. अर्धापूर तालुक्यातील सावरगाव, मालेगाव येथील दहा नागरिकांची वीजतोडणी केली. यामुळे नागरिकांना अंधारात गुजराण करण्याची वेळ आली आहे.
राज्य शासनाने नागरिकांकडील थकीत घरगुती वीजबिल प्रकरणी वीजजोडणी तोडण्याची घोषणा बुधवारी (ता. १०) केली. याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु झाली. गुरुवारी (ता. ११) जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज जोड तोडल्याच्या तक्रारी येत आहेत.
अर्धापूर तालुक्यातील सावरगाव, मालेगाव येथील अनेक नागरिकांची वीज तोडणी महावितरणकडून करण्यात आली. यावेळी अनेकांनी बिल भरण्यासाठी एक-दोन दिवसाची मुदत मागितली. परंतु वीज वितरण कंपनीकडून कनेक्शन तोडण्याचा धडाका सुरु होता. अर्धापूरमधील पांगरी येथे वीज तोडणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांचा रोष सहन करावा लागला. दरम्यान, मागीलवर्षी लॉगडाउनच्या काळापासून वीज बिल खंडित आहे.
मागील वर्षी लॉकडाउनच्या काळापासून वीजबिल थकीत होते. यानंतर काही प्रमाणात बिल भरण्याची तयारी केली. परंतु कार्यकर्ते तसेच राजकीय पक्षाच्या लोकांनी वीजबिल माफ होणार आहे, भरू नका, असे सांगितल्यामुळे बिल भरले नाही. आज वीजतोडणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतीमालाचे पैसे आल्यावर बिल भरतो, असे सांगितले. परंतु त्यांनी वीज खंडित केली. त्यामुळे आम्हाला अंधारात रात्र काढावी लागली. - भीमराव जावध, सावरगाव ता. अर्धापूर
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.