पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका : राजू शेट्टी

कृषी कायदे रद्द केले नाही, तर सरकारला सळो की पळो करून सोडू. सरकारला पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका : राजू शेट्टी
पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका : राजू शेट्टी

सांगली : केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रयत्न आम्ही उलटून लावू. राजकीय पक्षांना गुलाम केले आहे. कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. वेळ प्रसंगी बळीराजाची फौज घेऊन दिल्लीवर चाल करू. कृषी कायदे रद्द केले नाही, तर सरकारला सळो की पळो करून सोडू. सरकारला पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.  कृषी कायदे रद्द करावेत, वीजबिल माफ करा, यासाठी सोमवारी (ता. २५) येथील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चा सुरू झाला. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मोर्चा सांगलीहून जयसिंगपूर, हातकणंगले या मार्गे कोल्हापूर येथील दसरा चौकात जाणार आहे. या मार्गे जाताना दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहे. सांगली जिल्ह्यातील सुमारे २८ हून अधिक ट्रॅक्टर मोर्चामध्ये सामील झाले आहेत.  या वेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘‘दिल्लीत कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी (ता. २६) शेतकरी ट्रॅक्टर परेड करणार आहेत. आम्हालाही दिल्लीला जायचे होते, पण रेल्वेचा मार्ग बंद केला आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेकडील शेतकरी येऊ नयेत, यासाठी वाहने रोखून ठेवली आहेत. त्यामुळे आम्ही इथे ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादू लागले आहे. कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी मूठभर असल्याचे सरकार भासवीत आहे. राजकीय पक्षांना गुलाम केले आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक भूमिका घेत आहेत. पूर्ण देशभरातील शेतकरी या कायद्यांना विरोध करीत आहेत. केंद्र सरकार बाजारपेठा उद्ध्वस्त करण्याचे काम करीत आहेत.’’  गोऱ्या इंग्रजांप्रमाणे केंद्र सरकार वागू लागले आहे. आमच्याकडून कवडीमोलाने शेतीमाल खरेदी करून चौपट पटीने त्याची विक्री करणार आहे. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, अन्यथा बळीराजाची फौज घेऊन दिल्लीवर चाल करून हे कायदे रद्द करण्यास केंद्र सरकारला भाग पाडू, असा इशाराही माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com