दौरे, पंचनाम्यांचा फार्स नको, बाधितांना तत्काळ मदत करा : महाराष्ट्र राज्य किसान सभा

खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस व इतर पिके संपूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे दौरे, पंचनामे याचा फार्स न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेने केली आहे.
Don't go for tours, panchnamas, help the victims immediately
Don't go for tours, panchnamas, help the victims immediately

नगर : अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील १२ लाख हेक्‍टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत. मराठवाडा व विदर्भातील ओढे, नदी-नाल्यांना पूर आल्याने काठालगतची शेती संपूर्णपणे वाहून गेली आहे. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस व इतर पिके संपूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे दौरे, पंचनामे याचा फार्स न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेने केली आहे.

गुलाब चक्रीवादळ महाराष्ट्रातून गुजरात राज्यात पोहोचले असले तरी अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती नव्याने होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. अरबी समुद्रात जोरदार वाऱ्यासह उंच लाटा उठण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. झालेले नुकसान व हवामान खात्याने वर्तवलेले आगामी संकटाचे अंदाज पाहता राज्य व केंद्र सरकारने शेतकरी व आपद्‍ग्रस्तांना तातडीने साह्य करण्याची व आगामी संकटापासून बचावासाठी सावध करण्याची नितांत आवश्यकता आहे. आपत्तीच्या अशा भीषण कालावधीमध्ये राजकीय पाहणीचे दौरे व पंचनामे यांचा फार्स न करता राजकारण बाजूला ठेवत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, असे आव्हान किसान सभा करत आहे. केंद्र व राज्य सरकारने मिळून तातडीची प्राथमिक मदत म्हणून प्रतिहेक्टर ५०००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत व त्यानंतर पीक व शेतजमीन नुकसानीचा योग्य अंदाज घेत शेतकऱ्यांचे उर्वरित संपूर्ण नुकसान भरून निघणारी ठोस मदत करावी.

पीकविमा योजनेअंतर्गत आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत आपत्तीची सूचना देणे बंधनकारक आहे. कृषी व महसूल विभागाने शेतकऱ्यांना सर्व ते सहकार्य करावे. विमा कंपन्यांनी आपली कार्यालये व हेल्पलाइन २४ तास सुरू राहतील, अशी व्यवस्था करावी. रेंज अभावी शेतकऱ्यांना आपत्तीची ऑनलाइन सूचना देण्यात अडथळे येत असल्याने ऑफलाइन सूचना स्वीकारण्याची सुद्धा संपूर्ण व्यवस्था महसूल विभाग, कृषी विभाग व पीकविमा कंपन्यांनी करावी, अशी मागणी नेते डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com