शेतमाल वाहतुकीस अडथळा नकाे; नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतमाल वाहतुकीला आडकाठी न आणण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.
शेतमाल वाहतुकीस अडथळा नकाे; नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
शेतमाल वाहतुकीस अडथळा नकाे; नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतमाल वाहतुकीला आडकाठी न आणण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. मात्र त्यानंतरही स्थानिकस्तरावर पोलिसांकडून शेतमालाची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याची दखल घेत नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी संत्रा वाहतुकीत अडथळा न निर्माण करण्याच्या सूचना स्थानिकस्तरावर दिल्या आहेत.  कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परिणामी पोलिसांकडून रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना दंडुक्याचा मार दिला जात आहे. त्यामध्ये शेतमालाची वाहतूक करणारे वाहतूकदारही भरडल्या जात आहे. पोलिसांकडून त्यांनाही टार्गेट केले जात असल्याने तोडणीस आलेल्या संत्र्याचे करावे तरी काय ? अशा विवंचनेत संत्रा उत्पादक आहेत. त्याबाबतच्या तक्रारी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी संत्रा वाहतुकीत अडथळे न आणण्याचे निर्देश दिले आहेत.  काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्‍वर या भागात संत्रा लागवड आहे. संत्रा तोड करून त्याची वाहतूक शेतकरी करीत आहेत. त्याला अडथळा निर्माण करू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. ही अत्यावश्‍यक बाब असल्याने त्याला निर्बंध नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com