पंचनाम्याचे नाटक न करता सरसकट विमा नुकसानभरपाई द्या

पंचनाम्याचे नाटक नको ः राजू शेट्टी
पंचनाम्याचे नाटक नको ः राजू शेट्टी

परभणी ः नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे नाटक न करता सरसकट विमा नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मंजूर करावी. मागच्या वर्षीचा दुष्काळ आणि यंदा खरिपाच्या ऐन सुगीत झालेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांचे किमान एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

बुधवारी (ता. ६) येथे पत्रकार परिषदेत शेट्टी पुढे म्हणाले, की मराठवाड्यासह राज्यातील कुठलेली पीक पावसाच्या तडाख्यातून वाचलेले नाही. मका, सोयाबीन, कापूस, ज्वारी, द्राक्ष, डाळिंब आदि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जमिनी खरडून गेल्या आहेत. मागच्या वर्षीचा दुष्काळ आणि यंदाची अतिवृष्टी यामुळे शेतकरी मोडून पडला आहे. राज्यातील काळजीवाहू सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही. 

या परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित आहे. परंतु केंद्राचे पथक अजून नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले नाही. केंद्राकडून सातत्याने महाराष्ट्राची उपेक्षा केली जात आहे. किमान एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय राज्यातील शेतकरी उभा राहणार नाही. विम्याचा पहिला हप्ता तत्काळ अदा करणे आवश्यक आहे. सरकारी यंत्रणा पंचनामे करतांना अनास्था दाखवत आहेत. 

आजवर कोट्यवधी रुपयांची लूट केलेल्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे गंडविण्याची भूमिका घेतली तर त्यांना वठणीवर आणू. सरकार कुणाचेही येवो शेतकऱ्यांचे प्रश्‍न गांभीर्याने घेतले नाही तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी स्वाभिमानी रस्त्यावर उतरेल. या वेळी वस्त्रोउद्योग महामंडळांचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, केशव आरमळ, भगवान शिंदे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com