पुणेः शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या प्रश्नांमध्ये जमिनीचे आरोग्य टिकवणे, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. पिकांच्या संतुलित पोषणासाठी जमिनीचे आरोग्य हा महत्त्वाचा घटक आहे. जमिनीचे आरोग्य चांगले असेल, तरच मानव व पशूंचे पोषण चांगल्या पद्धतीने होईल. गेल्या काही वर्षांपासून असंतुलित पद्धतीने पाणी आणि रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची कार्यक्षमता कमी झाली आहे. सेंद्रिय खतांचा वापर कमी झाल्याने जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची कमतरता जाणवत आहे. सेंद्रिय कर्बाच्या कमतरतेमुळे तापमान, सूक्ष्मजीव, खनिजीकरण प्रक्रिया, सूक्ष्म अन्नद्रव्य प्रक्रिया बिघडली आहे. एकंदरीत जमिनीचे आरोग्य व उत्पादनाचे गणित बिघडले आहे. पूर्वी ८० टक्के सूक्ष्मअन्नद्रव्ये जमिनीत उपलब्ध असायची. कमतरता असलेल्या केवळ २० टक्के अन्नद्रव्यांची पूर्तता करावी लागत असते. मात्र आता हे गणित उलटे झाले आहे. पर्यायाने उत्पादनखर्च वाढला आहे. कोणत्याही खतांचा, अगदी विद्राव्य खतांचाही अतिरिक्त वापर हा जमिनीसाठी घातक आहे. मातीतील उपलब्धता आणि पिकांची आवश्यकता यानुसार खतांचा वापर संतुलितपणे करण्याची आवश्यकता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी व्यक्त केली. भाषणातील मुख्य मुद्दे :
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.