ताकारीच्या पाण्याने भरले ओढे, नाले

drains, canal full of Takari water
drains, canal full of Takari water

वांगी, जि. सांगली : कडेगाव तालुक्‍यात गेल्या दोन महिन्यांपासून शेती व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. यांस अनुसरून आठ दिवसांपूर्वी कडेगाव तालुक्‍याला वरदान ठरणारी ताकारी योजनेचे आवर्तन सुरू झाले. त्यामुळे ओढे, नाले भरले आहेत. तूर्तास शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. 

सुरुवातीचे आठ दिवस कालव्याच्या प्रारंभाचे कुंभारगाव ते वांगीपर्यंत २१ कि.मी. कालव्यातून शेतीसाठी पाणी दिले गेले. ते कालपासून बंद झाले आहे. हे पाणी सध्या कालवा कि.मी. २१ ते ४४ पर्यंत पूर्ण क्षमतेने सोडले आहे. 

कडेगाव तालुक्‍यात ऑगस्टमध्ये पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने तालुक्‍यात पाण्याची टंचाई भासली नव्हती. परंतु जमिनीतील पाण्याच्या सततच्या अमर्याद उपशामुळे सर्वच गावांतील पाणीपातळी खालावल्याने शेतीच्या पाण्याची शेतकऱ्यांना मोठी टंचाई जाणवू लागली होती. त्यामुळे ताकारीचे आर्वतन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. 

तालुक्‍यात सध्या पाण्याअभावी नदी, बंधारे, ओढे कोरडे पडले आहेत. पाण्याअभावी ऊस, रब्बी व बारमाही पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल बनला होता. सध्या ऊसतोडणी सुरू असून पाण्याअभावी वजनात तूट येत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ऊस, द्राक्ष बागा तसेच फळभाज्या जगावयच्या कशा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. गहू, शाळू तसेच हरभरा यांची पेरणी ही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com