शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी नौटंकी ः अजित पवार 

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी नौटंकी ः अजित पवार 
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी नौटंकी ः अजित पवार 

नाशिक : भाजप आणि शिवसेनेकडे सत्ता आल्यानंतर राज्य अधोगतीकडे जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पीकविमा कंपन्यांविरोधात आंदोलन करीत आहेत. सत्तेत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी हे सरकार तर नौटंकी करीत आहे, अशी खरमरीत टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युती सरकारवर केली. 

शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या दिवशी दौऱ्यात गुरुवार (ता. ८) निफाड येथील सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. या वेळी माजी खासदार देविदास पिंगळे, समीर भुजबळ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, माजी आमदार दिलीप बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या वेळी श्री. पवार म्हणाले, ‘‘हे सरकार खासगी मार्केट कमिट्यांना परवानगी देतंय. पण, शेतकऱ्यांच्या मार्केट कमिट्या, सहकारी संस्था बंद पाडण्याची यांची तयारी सुरू आहे. एमपीएससी परीक्षांत मेरिटमध्ये आलेल्या आदिवासी, मागासवर्गीय, खुल्या प्रवर्गातल्या मुलांना रोजगार द्या म्हटलं तर, हे सरकार देत नाही.’’ 

आमची ताकद वाढली, असे सत्ताधारी म्हणत आहेत. मात्र, सरकारने राज्य सरकारवरील कर्जाचा बोजा वाढवला आहे. इथं जन्माला येणारं मूल डोक्यावर कर्ज घेऊन येतं. मराठा समाजाच्या आरक्षणाचे श्रेय लाटण्याचे काम भाजप-शिवसेना करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात देखील हे सरकार उदासीन आहे. अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. कित्येक शेतकऱ्यांना थकबाकीदार म्हणून हिणवले, या संदर्भात फडणवीस सरकार का ठोस पावले उचलत नाही. पूरपरिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यात बोट उलटून १४ जण दगावले आहेत. याला कोण जबाबदार? हे सरकारला शोभतं का?’’ असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. यानंतर ही यात्रा कळवण, बागलाण या तालुक्यांमध्ये गेली. या वेळी शेतकरी, तरुण यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. 

निफाड तालुक्यात असलेली औद्योगिक क्षेत्र बंद पडत आहेत. यासाठी सरकारकडून याकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक नागरिकांना रोजगाराची समस्या निर्माण झाली असताना, इथे सुरू असलेले उद्योग धंदे परराज्यात जात असताना येथील लोकप्रतिनिधी झोपले की काय? गेली १० वर्षे इथल्या सहकारी साखर कारखान्याचे घोंगडे भिजत ठेवले आहे. भाकरी फिरवण्याची आता हीच वेळ, अशी बोचरी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com