पाणी बचतीसाठी फळांची विरळणी करा ः शास्रज्ञ डॉ. संजय पाटील

पाणी बचतीसाठी फळांची विरळणी करा ः शास्रज्ञ डॉ. संजय पाटील
पाणी बचतीसाठी फळांची विरळणी करा ः शास्रज्ञ डॉ. संजय पाटील

औरंगाबाद : ‘‘दिवसेंदिवस कमी कमी होत जाणारे पर्जन्यमान, हवामानातील बदल, जमिनीची कमी होत जाणारी सुपीकता लक्षात घेता कोरडवाहू फळपीक लागवडीकडे शेतकऱ्यांनी वळणे तसेच पाणी बचतीसाठी फळांची विरळणी करणे फायदेशीर ठरेल’’ असे प्रतिपादन फळ संशोधन केंद्र हिमायातबागचे शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्रातर्फे सोमवारी (ता. १) आयोजित शेतकरी-शास्रज्ञ मंच कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा सत्र न्यायाधीश पी. के. चावरे होते. तर प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ तायडे, माजी शहर अभियंता मुरलीधर सोनवणे व्यासपीठावर उपस्थित होते. 

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘सद्यःस्थितीत पाणीटंचाईमुळे फळबागाचे उत्पादन घेण्यापेक्षा बाग जागविण्यावर भर द्यावा. त्यासाठी सेंद्रीय आच्छादनाचा वापर करावा. बहारात असणाऱ्या फळांची विरळणी करावी. त्यामुळे पाणी बचतीसोबतच फळांची चांगली प्रतदेखील मिळण्यास मदत होईल. चिंच, जांभूळ, सीताफळ पिकांना भविष्यात संधी राहणार आहे.’’ समन्वयक दीप्ती पाडगावकर यांनी तर डॉ. अनिता जिंतुरकर यांनी आभार मानले. या वेळी शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com