दुष्काळी स्थितीचा दूध व्यवसायाला फटका

दुष्काळी स्थितीचा दूध व्यवसायाला फटका
दुष्काळी स्थितीचा दूध व्यवसायाला फटका

धुळे : गायीच्या दुधाचे घटलेल्या, तर चारा आणि पशुखाद्याच्या वाढलेल्या दरांमुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दूध उत्पादकांना शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा आणि धुळे जिल्ह्यांतील शिरपूर, साक्री, धुळे व शिंदखेडा हे तालुके दुष्काळी आहेत. शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबार, शहादा, धुळ्यात दूध उत्पादक अधिक आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी दुधाच्या खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय झाला होता. परंतु हा निर्णय मागे घेतला. पुन्हा नवीन निर्णय घेऊन गायीच्या दुधाला २५ रुपये प्रतिलिटर दर द्यावा. पाच रुपये अनुदान शासन देईल, असे शासनाने आदेश काढले. या गोंधळात गायीच्या दुधाचे दर पुन्हा कमी झाले. कारण दुधाचे अतिरिक्त संकलन होत असल्याचे दूध खरेदीदारांचे म्हणणे आहे.

खासगी दूध संस्थाचालकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना वाढीव दर मिळाला नाही. सध्या गायीच्या दुधाला १७ रुपये ते १९ रुपये प्रतिलटरचे दरही खरेदीदार देत नसल्याची स्थिती आहे.  

दुष्काळी स्थितीमुळे हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी आहे. मागणी मात्र प्रचंड वाढली असल्याने या चाऱ्यासह इतर पशुखाद्याचे दर वाढले आहेत. ग्रामीण भागामध्ये शेतीपूरक उद्योग म्हणून अनेक जण दूध व्यवसाय करतात. अनेकांनी त्यात मोठी गुंतवणूक केली आहे. येत्या काळात चाऱ्याचे संकट वाढेल. दूध उत्पादन कमी होऊन शेतकऱ्यांना आणखी फटका बसेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com