दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा आमचा अजेंडा ः मुख्यमंत्री फडणवीस

दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा आमचा अजेंडा ः मुख्यमंत्री फडणवीस
दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा आमचा अजेंडा ः मुख्यमंत्री फडणवीस

सोलापूर ः सोलापूरसह अन्य नजीकच्या जिल्ह्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी भाजप-शिवसेना महायुती कटिबद्ध आहे. कोल्हापूर, सांगली या भागातील पुराचे पाणी सोलापूरकडे वळवण्यासाठी योजना आखत आहोत. या जिल्ह्याचा दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना महत्त्वाची आहे आणि ती आम्ही राबवणारच, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. 

भाजप-शिवसेना, रिपाइं, शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारासाठी मंगळवेढा येथे गुरुवारी (ता. १०) आयोजित प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, उमेदवार सुधाकर परिचारक, माजी आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘महायुतीच्या सरकारने पाच वर्षात केलेला पारदर्शी कारभार आणि विकासकामाच्या जोरावर पुन्हा एकदा आम्ही सत्तेत येऊ. या पाच वर्षात अनेक निर्णय आम्ही घेतले. ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. दुष्काळ निधी दिला. अतिवृष्टीत मदत केली. ट्रॅक्‍टरसाठी अनुदान दिले. जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. सामान्यांच्या उपचारासाठी मदत केली. जलयुक्त शिवारसारख्या योजनेतून मोठे काम उभे राहिले. अनेक निर्णय सांगता येण्यासारखे आहेत. शेतकरी आणि सामान्य माणूस पहिल्यापासूनच आम्ही केंद्रबिंदू मानला. पण विरोधी पक्ष आज गलितगात्र झाला आहे. सोलापूरच नव्हे, तर आगामी काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आमचा अजेंडा असेल, असेही ते म्हणाले. ’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com