दुष्काळी पट्ट्यातील विहिरींचे पाणी संपुष्टात

दुष्काळी पट्ट्यातील विहिरींचे पाणी संपुष्टात
दुष्काळी पट्ट्यातील विहिरींचे पाणी संपुष्टात

विटा, जि. सांगली : खानापूर घाटमाथा व तालुक्‍याच्या दुष्काळी पट्ट्यातील विहिरींचे पाणी संपुष्टात आले आहे. प्रशासनाने टंचाईग्रस्त सहा गावांत टॅंकर सुरू केली आहेत. बोअर अधिग्रहण करून १५ गावांत प्रशासनाने पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. 

तालुक्‍यात सधन, दुष्काळी असे दोन भाग आहेत. सध्या दुष्काळी पट्ट्यातील काही गावांना टेंभूचे पाणी मिळत अाहे. खानापूर घाटमाथ्यावरील सुलतानगादे, मेंगाणवाडी, बलवडी (खा), भडकेवाडी, बेणापूर (वस्ती), हिवरे, मंगरूळ, चिंचणी, पोसेवाडी, मानेवाडी, गोरेवाडी, मेंगाणवाडी, मोही, वासुंबे, हिवरे (वस्ती) या गावांत बोअर अधिग्रहण करण्यात आले आहेत. या बरोबरच हिवरे, बाणूरगड, बेणापूर, पळशी, ताडाचीवाडी व करंजे गावांतील लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याचे स्रोत असणाऱ्या विहिरी आटल्या आहेत. प्रशासन प्रत्येक व्यक्तीला वीस लिटर पाणी देत आहे. 

टेंभूच्या कार्यक्षेत्रात असलेल्या हिंगणगादे, चिखलहोळ, माहुली, वलखड, भिकवडी बुद्रुक, वेजेगाव, साळसिंगे, भाग्यनगर, तसेच भाग्यनगर तलावानजीक असलेल्या नागेवाडी, घानवड, गार्डी या गावांचा टेंभूच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जानेवारी महिन्यापासून अन्य गावांतही पाणीटंचाई जाणवणार असल्याने टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com