परभणी : जून महिन्यात पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील ५ लघू सिंचन तलाव अद्याप कोरडे आहेत. तर, ७ लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. या तलावांवर पाणीपुरवठ्यासाठी अवलंबून असलेल्या गावांतील पाणीटंचाईचे सावट अजून कायम आहे.
बेसुमार उपसा, बाष्पीभवन आदी काराणांमुळे जिल्ह्यातील २२ लघु सिंचन तलावांपैकी १२ तलावांतील उपयुक्त पाणीसाठा संपला होता. त्यानंतरही उपसा सुरु राहिल्याने ५ तलाव कोरडे पडले होते. तर, ७ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला. यंदाच्या पावसाळ्यातील एक महिना संपला आहे. परंतु, पाणलोटक्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे पेडगाव (ता.परभणी), जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा (सर्व ता.जिंतूर) हे तलांव अद्याप कोरडे आहेत.
जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या तलावांमध्ये आंबेगाव (ता.मानवत), चिंचोली, आडगाव, केहाळ, भोसी, मांडवी, दहेगाव (सर्व ता.जिंतूर) या तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. उपयुक्त पाणीसाठा असलेल्या तलावांमध्ये झरी (ता.पाथरी) ९४ टक्के, नखातवाडी (ता. सोनपेठ) ३ टक्के, तांदुळवाडी (ता.पालम) १४ टक्के, राणीसावरगाव (ता.गंगाखेड) ४५ टक्के, टाकळवाडी (ता.गंगाखेड) १८ टक्के, पिंपळदरी (ता.गंगाखेड) ५० टक्के, देवगाव (ता.जिंतूर) १ टक्का या तलावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील करपरा (ता.जिंतूर) आणि मासोळी (ता.गंगाखेड) या दोन प्रकल्पांतील पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे. या प्रकल्पांमध्ये अनुक्रमे १९ टक्के आणि ३० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.