मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प कोरडे

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ४५ टक्क्यांवर आला आहे. जवळपास १०१ लघु मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.
Dry over 100 small medium project in Marathwada
Dry over 100 small medium project in Marathwada

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ४५ टक्क्यांवर आला आहे. जवळपास १०१ लघु मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. दुसरीकडे मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा २२ टक्क्यांवर, तर लघु प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यांवर आल्याने चिंता वाढली आहे. 

मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांत ४५.९१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पांत ५६.९५ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ३०.१४ टक्के, ७४९ लघु प्रकल्प २१.९५ टक्के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांत ५१.६८ टक्के तर, तेरणा, मांजरा व रेणा येईना नदीवरील पंचवीस बंधाऱ्यांत केवळ ८.६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. 

मोठ्या ११ प्रकल्पांपैकी मांजरा व सीनाकोळेगाव प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे पावसाळ्यात तुडुंब झालेले जायकवाडी जलाशय उपयुक्त पाण्याबाबत ६५ टक्क्यांवर आले आहेत. मोठ्या प्रकल्पांपैकी सिद्धेश्‍वर प्रकल्‍पात २२ टक्के, विष्णुपुरी ३५ टक्के, निम्न तेरणा ३५ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात केवळ १ टक्केच उपयुक्त पाणी आहे. नांदेड जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्प वगळता काही मध्यम प्रकल्पांत पन्नास टक्केही उपयुक्त पाणी नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत केवळ २६ टक्के, जालना मधील ७ प्रकल्पांत २१ टक्के, बीड मधील १६ प्रकल्पांत ३३ टक्के, लातूरमधील आठ प्रकल्पांत १२ टक्के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत २२ टक्के, परभणीमधील दोन मध्यम प्रकल्पांत ४९ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे. 

मध्यम प्रकल्पांपाठोपाठ लघु प्रकल्पांची स्थितीही समाधानकारक नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघु प्रकल्प २३ टक्के, जालन्यातील ५३ प्रकल्पांत १३ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत २४ टक्के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत २७ टक्के, उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत १३ टक्के, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ३८ टक्के, परभणीमधील २२ प्रकल्पांत २१ टक्के, तर हिंगोली जिल्ह्यातील २६ लघु प्रकल्पांत केवळ ३१ टक्केच उपयुक्त पाणी आहे. 

१८५ प्रकल्प जोत्याखाली 

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प कोरडे आहेत. यामध्ये औरंगाबाद व लातूरमधील प्रत्येकी दोन, तर बीडमधील चार मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. तेरा मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद व बीड मधील प्रत्येकी तीन, लातूरमधील दोन, उस्मानाबादमधील ४ व जालना जिल्ह्यातील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. ७४९ लघु प्रकल्पांपैकी ९३ लघु प्रकल्प कोरडे आहेत. त्यात औरंगाबादमधील २६, जालना १२, बीड २७, लातूर १३, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १५ प्रकल्पांचा समावेश आहे. तब्बल १७२ लघु प्रकल्प जोत्याखाली आहेत. त्यामध्ये औरंगाबादमधील तीन, जालना १८, बीड ३०, लातूर ४४, उस्मानाबाद ६१, नांदेड ७, परभणी ८, तर हिंगोली जिल्ह्यातील १ लघु प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com