ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ, उष्ण वातावरण आहे. मळणीवर आलेली ज्वारी, हरभरा पिकाच्या नुकसानीची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

हाती घास आला असताना अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानातही घट झाली आहे. किमान तापमान १५ अंश सेल्सीअसपर्यंत पोचले आहे. उष्णता वाढल्याने सिंचनासाठी पाण्याची गरज वाढली आहे. सिंचनासाठी ठिबकची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांना फारशी अडचण नाही. परंतु पाट पद्धतीने कांदा, हरभरा व मका पिकाचे सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. हलक्‍या, मध्यम प्रकारच्या जमिनीत अधिकचे पाणी लागत आहे. दिवसा चार दिवस व रात्री दोन दिवस वीजपुरवठा सुरू असतो. अर्थातच रात्रंदिवस शेतात सिंचनाच्या लगबगीत शेतकरी आहेत.

चोपडा, जळगाव, पाचोरा, रावेर, धुळे, शिरपूर, नंदुरबार, शहादा, तळोदा भागांत अनेक ठिकाणी हरभऱ्याची कापणी झाली. मळणीसाठी शेतात त्याचे ढीग आहेत. ते वाळविण्यासाठी ताडपत्रीने झाकले नाहीत. काही ठिकाणी ज्वारीची कापणी पूर्ण होऊन कणसेही मळणीसाठी गोळा करण्यात आली आहेत. परंतु अशातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे ज्वारी, हरभरा उत्पादकांमध्ये भीती आहे. गव्हाचे पीक जोमात असून, दाणे भरले आहेत. आता अवकाळी पाऊस, हलका वाराही आला तर पीक लोळेल व मोठे नुकसान होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यावल, रावेर, मुक्ताईनगर, शहादा व शिरपूर भागात केळी काढणीवर आहे. पक्व होत अलेल्या घडांची काढणी शेतकरी करून घेत असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com