जिल्हाबंदीमुळे १५ हजार ऊसतोड मजूर साताऱ्यात अडकले

सातारा : जिल्ह्यात प्रत्येक वर्षी ऊस गळीत हंगामासाठी येणारे ऊस तोडणी कामगार आता हंगाम संपत आल्याने परत जाण्याची तयारी करीत आहेत. पण, सध्या ‘कोरोना’मुळे लॉकडाऊन सुरू आहे. तसेच जिल्हाबंदी असल्याने या कामगारांना परत आपल्या घरी जाता येत नाही. त्यांचा मुक्काम कारखाना कार्यस्थळावरच आहे. जिल्ह्यात १५ हजार ऊसतोडणी कामगार अडकून पडले आहेत. काहींनी आपापल्या जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क करून आम्हाला घरी येण्याची सोय करा, अशी विनंती करण्यास सुरुवात केली आहे.
Due to district blockade, 15,000 sugarcane laborers got stuck in Satara
Due to district blockade, 15,000 sugarcane laborers got stuck in Satara

सातारा : जिल्ह्यात प्रत्येक वर्षी ऊस गळीत हंगामासाठी येणारे ऊस तोडणी कामगार आता हंगाम संपत आल्याने परत जाण्याची तयारी करीत आहेत. पण, सध्या ‘कोरोना’मुळे लॉकडाऊन सुरू आहे. तसेच जिल्हाबंदी असल्याने या कामगारांना परत आपल्या घरी जाता येत नाही. त्यांचा मुक्काम कारखाना कार्यस्थळावरच आहे. जिल्ह्यात १५ हजार ऊसतोडणी कामगार अडकून पडले आहेत. काहींनी आपापल्या जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क करून आम्हाला घरी येण्याची सोय करा, अशी विनंती करण्यास सुरुवात केली आहे. 

जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामात यावर्षी १४ साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सात सहकारी व सात खासगी कारखान्यांचा समावेश होता. ऊस तोडणीसाठी हंगाम सुरू होण्यापूर्वीच कामगारांचे करार होतात. या वर्षी जिल्ह्यात तब्बल ५० हजारांवर ऊसतोडणी कामगार विविध कारखान्यांच्या कार्यस्थळावर आले होते. यावर्षी ऊस गळीत हंगाम लांबला नाही. तरीही थोडाफार शिल्लक असलेल्या ऊस तोडणीचे काम करून सध्या ऊसतोडणी कामगार कारखाना कार्यस्थळावरच थांबले आहेत. 

सध्या ‘कोरोना’ची साथ असून, देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नाही. त्यामुळे हंगाम संपत आला तरी जिल्ह्यात सध्या शिल्लक राहिलेल्या १५ हजार ऊसतोडणी कामगारांना त्यांच्या जिल्ह्याकडे जाणे अवघड झाले आहे. सध्या जिल्हा प्रशासनाने ऊसतोडणी कामगारांची सर्व व्यवस्था त्या-त्या कारखान्याने करावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे हे कामगार कारखाना कार्यस्थळावरच थांबून आहेत. 

सध्या तीनच कारखान्यांचे गळीत सुरू आहे. त्यात अजिंक्‍यतारा, कृष्णा आणि सह्याद्री कारखान्यांचा समावेश आहे. पाच हजारांपेक्षा अधिक क्षमता असलेल्या साखर कारखान्यांकडे पाच ते सहा हजार ऊसतोडणी मजूर असतात. तर त्या आतील क्षमता असलेल्या कारखान्यांकडे तीन ते चार हजार मजूर तोडणीसाठी येतात. यावर्षी साधारण ५० हजार ऊसतोडणी मजूर जिल्ह्यात आले होते. आता त्यापैकी १५ हजारावर ऊस तोड कामगार जिल्ह्यात आहेत. 

राज्यभरातून येतात मजूर थोड्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने तो तोडणी झाल्यावर या मजुरांना घराकडे जायचे आहे. पण, लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांच्या जिल्ह्यात जाता येत नाही. अशा वेळी काही कामगारांच्या मुकादमांनी आपल्या जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क करून आमची घरी येण्याची सोय करा, अशी विनवणी करत आहेत. सातारा जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी मुख्यत्वेकरून बीड जिल्ह्यातून कामगार येतात. त्यासोबतच नगर, जालना, यवतमाळ जिल्ह्यांतूनही ऊसतोडणी मजूर येतात.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com