कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा फटका

कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा फटका
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा फटका

धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी तळ गाठला आहे. यातच जिल्हा परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून हाती घेतलेल्या विहीर निर्मितीच्या कामातही दुष्काळामुळे अडथळे येत आहेत. पाण्याचे स्रोत अधिक खोल गेल्याने खोलीकरणासाठी निधीही अधिक लागणार आहे. 

खानदेशात धुळे व व नंदुरबार जिल्ह्यात पाण्याच्या पातळी तीन ते चार मीटरपर्यंत घटली आहे. शहादा तालुक्‍याचा पूर्व भाग आणि धुळे, शिंदखेड्याच्या पूर्व भागातही दुष्काळी स्थिती आहे. पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने आगामी सहा महिने कसे काढायचे, हा प्रश्‍न आहे. 

धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, धुळे व साक्री भागात समस्या बिकट आहे. नंदुरबारमध्ये नंदुरबार पूर्व व शहादा पूर्व भागात जलसंकट तीव्र होत आहे. रब्बी हंगामावरही परिणाम झाला आहे. शासकीय योजनांमधील विहिरींच्या कामांनाही फटका बसत आहे. स्वावलंबन योजनेतून सुमारे ३५० विहिरींची कामे जळगाव, धुळे व नंदुरबारात यंदा होतील, अशी अपेक्षा आहे. दोन वर्षांत निधी खर्च करण्याची तरतूद असून, तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार कृषी विकास अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून ही कामे गतीने सुरू आहेत. 

साडेतीन लाख रुपये निधी या कामांसाठी मिळेल. सुमारे ४० व ६० मीटरपर्यंत विहिरींचे खोलीकरण करता येईल. या खोलीपर्यंत पाण्याचा स्त्रोत चाळीसगाव, शिंदखेडा व नंदुरबार भागात मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अधिक खोलीकरण करावे लागेल. मग पुढील खोदकामासाठी शासनाकडून निधी मिळणार नाही. कारण विहिरी, कूपनलिकांच्या २०० फूटांपेक्षा अधिक खोलीकरणास शासनाची परवानगी नाही. अशा स्थितीत काम मध्येच सोडून देण्याची वेळ अनेक ठिकाणी येईल, असे जिल्हा परिषदेचे सदस्य नानाभाऊ महाजन म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com