खानदेशात हरभऱ्याला दुष्काळाचा फटका

खानदेशात हरभऱ्याला दुष्काळाचा फटका
खानदेशात हरभऱ्याला दुष्काळाचा फटका

जळगाव : खानदेशात यंदा रब्बी पिकांमध्ये गहू, हरभऱ्याची पेरणी जवळपास आटोपली आहे. हरभऱ्याची सुमारे दोन लाख हेक्‍टवर पेरणी अपेक्षित होती, परंतु ती सुमारे सव्वालाख हेक्‍टरपर्यंत झाल्याचा अंदाज आहे. क्षेत्र कमी राहिल्याने उत्पादन कमी येईल, अशी स्थिती आहे. 

खानदेशात रब्बीची पेरणी अजूनही ५० टक्‍क्‍यांखालीच आहे. धुळे, नंदुरबारमध्ये दुष्काळीस्थिती अधिक आहे. जळगावमधील अमळनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, बोदवड, जामनेर व धरणगाव भागात कोरडवाहू हरभरा अल्प क्षेत्रात आहे.

धुळ्यात शिंदखेडा व धुळे तालुक्‍यात, नंदुरबारात नंदुरबार व शहादा भागात कोरडवाहू हरभऱ्याचा अपवाद वगळता पेरणी नाही. कारण ओलावा नव्हता. काळ्या कसदार जमिनीतही शेती ओलावण्याची गरज होती. त्याशिवाय पेरणी शक्‍य नव्हती. हरभऱ्याची स्थिती आहे, तशीच स्थिती कोरडवाहू ज्वारी किंवा दादरची आहे. त्याची पेरणी पाचोरा, भडगाव, शिंदखेडा, अमळनेर, शहादा भागात अपवाद वगळता नाही. जळगाव तालुक्‍यातील आसोदा, नशिराबादा, भादली, कानळदा आदी भागात ज्वारीचे पीक वाळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com