खानदेशात अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचनाचे नियोजन कोलमडले

खानदेशात अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचनाचे नियोजन कोलमडले
खानदेशात अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचनाचे नियोजन कोलमडले

जळगाव : शिवारात सध्या कांदा, बाजरी, मका आदी पिकांचे पाट पद्धतीने सिंचन करण्याचे काम गतीने सुरू आहे. परंतु वीजपुरवठा अनियमित, कमी दाबाने वीज मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषिपंप जळण्याचे प्रकारही होत आहेत याचा फटका बसत आहे. यासंदर्भात महावितरण विभागाने वीज वितरण यंत्रणेत सुधारणा करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

खानदेशात ऊन तापत आहे. कमाल तापमान ४१ अंश सेल्‍सिअसवर पोचले आहे याचा फटका पिकांना बसत आहे. कांदा, मका, बाजरी आदी पिकांना पाट पद्धतीने हलक्‍या व मध्यम प्रकारच्या जमिनीत दोन दिवसाआड सिंचन करावे लागत आहे. त्यासाठी शेतकरी रात्रंदिवस शेतात थांबत आहेत. सर्वत्र चार दिवस दिवसा वीज मिळते. काही भागांत बुधवार ते शनिवार दिवसा, तर काही भागात सोमवार ते गुरुवार दिवसा वीज मिळत असल्याची स्थिती आहे.

हलक्‍या, उताराच्या जमिनीत सिंचन करताना दिवसा कार्यवाही करावी लागते. परंतु, दिवसा वीजपुरवठा नियमित नसतो. मध्येच वीज बंद होते. त्यामुळे सिंचनाचे काम रखडते. दिवसभरात एक एकर सिंचनाची क्षमता असलेला कृषिपंप अर्धा एकरही सिंचनासाठी देखील उपसा करू शकत नाही. विजेच्या कमी दाबामुळे कृषिपंप जळण्याचे प्रकार होत आहेत.

कूपनलिकांचे पंप काढण्यासाठी १५००, तर सात अश्‍वशक्तीचा पंप दुरुस्तीसाठी चार ते पाच हजार रुपये खर्च लागतो. पुन्हा पंप कूपनलिकेत सोडायला १५०० रुपये लागतात. अर्थातच सहा ते साडेसहा हजार रुपये खर्च पंप दुरुस्तीसाठी लागतो. सिंचनाचे काम लांबणीवर पडते. पिके जळतात, त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com