अकोला जिल्ह्यात पावसाने खंड देताच पिकांना तुषार सिंचन

पावसाच्या खंडामुळे शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करीत आहेत.
पावसाच्या खंडामुळे शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करीत आहेत.

अकोला : पावसाने खंड देताच शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करू लागले आहेत. पिकांना ही ओढ सहन होणार नसल्याने काही शेतकऱ्यांनी तुषार पद्धतीने सिंचन सुरू केले आहे.

जिल्ह्यात आजवर असमतोल स्वरूपात पाऊस झालेला आहे. त्यामुळे पेरण्यासुद्धा मागे-पुढे झाल्या आहेत. सुरवातीच्या टप्प्यात पेरणी केलेल्यांची पिके साधली आहेत. मात्र आता अनेक भागांत जवळपास १५ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. ताशी लागलेल्या पिकांमध्ये सध्या आंतरमशागत, तणनाशकाची फवारणी, निंदण आदी कामे जोमाने सुरू आहेत. मात्र पावसाचा ताण पिकांवर पडणे सुरू झाले आहे. दुपारच्या सुमारास पिके कोमजलेली दिसून येतात. याचा फटका बसू नये यासाठी शेतकऱ्यांनी सिंचन सुरू केले आहे.

जिल्ह्यात आजवर सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यात तर पेरण्यासुद्धा झालेल्या नाहीत. जिल्ह्यात अद्यापही ४० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होणे बाकी आहे. आता पावसात खंड पडला असून या भागात आणखी चार ते पाच दिवस पाऊस उघडीप घेऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. असे झाल्यास पावसाचा हा खंड १५ दिवसांवर पोचू शकतो. अशावेळी उगवलेली पिके; तसेच पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके अडचणीत सापडू शकतात. यासाठी शेतकऱ्यांची आता लगबग वाढली आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी सिंचनाचे काम हाती घेतले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com