अवकाळीमुळे उजनीच्या कालव्याचे आवर्तन लांबण्याची शक्‍यता

दरम्यान, कालव्यातून २० मार्चच्या आसपास पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. पण, शेतकऱ्यांची मागणी वाढल्याने ते एक-दोन दिवसांत सोडण्याचा विचार आहे. त्यातच आता अवकाळी सुरू झाला आहे. त्यामुळे विचार करु, - धीरज साळे, अधीक्षक अभियंता,लाभक्षेत्र विकास प्राधिकरण.
Due to premature, it is possible to extend the canal's rotation
Due to premature, it is possible to extend the canal's rotation

सोलापूर : जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फायदा ऊस पिकाला होणार आहे. तरीही द्राक्ष, ज्वारी, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण, आता या अवकाळी पावसामुळे उजनी धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन लांबण्याची शक्‍यता आहे. 

उजनी धरणातून कालव्याद्वारे शेतीला पाणी सोडण्याचे नियोजन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून केले आहे. कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे त्या मागणीची धार थोडीशी बोथट झाल्याचे दिसून येते.

शेतकऱ्यांकडून मागणी होत असल्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मागील आवर्तनावेळी जास्त पाण्याची आवश्‍यकता नसल्याने ते बंद करण्यात आले होते. मात्र, मागील आठवड्यात तापमानामध्ये वाढ झाली. आता अवकाळीमुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने तापमानात घट झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com