परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोयाबीन काढणीच्या कामांमुळे इतर शेती कामांसाठी मजूर मिळेनात. अनेक भागांत शेतात पाणी साचलेले आहे. त्यामुळे कापूस वेचणीची कामे खोळंबली आहेत. परिणामी, बोंडातून फुटलेला कापूस गळून पडत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
यंदा परभणी जिल्ह्यात १ लाख ८१ हजार १५५ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यात ३० हजार ६५४ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. जूनच्या सुरवातीला लागवड केलेल्या तसेच लवकर येणाऱ्या वाणाच्या कपाशीची जवळपास सर्वच बोंडे आहेत. अतिवृष्टीमुळे सखल, पाणथळ जमिनीवरील पिकांमधील पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे जमिनीलगतच्या सर्व फांद्यांची बोंडे सडली आहेत. सततच्या पावसामुळे बोंडातून फुटलेला कापूस झा़डावरच भिजला. सरकीला कोंब फुटले. धागे पिवळे पडले आहेत. उन्हामुळे ओलावा कमी झाल्यानंतर बोंडातून मोकळा झालेला कापूस पाण्यात पडत आहे.
भिजल्यामुळे कापसाच्या दर्जावर परिणाम झाला आहे. त्यास कमी दर मिळून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. दोन एकरांवरील कपाशीची जवळपास सगळीच बोंडे फुटली आहेत. परंतु सोयाबीन काढणीमुळे कापूस वेचणीच्या कामासाठी मजूर मिळेनात. फुटलेला कापूस पावसात भिजून नुकसान झाले आहे. - बाजीराव शेवाळे, गणपूर, जि. परभणी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.