‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचित

‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचित
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचित

सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला म्हैसाळ उपसा सिंचन योजने पाणी द्या, अशी मागणी शेतकरी गेल्या ३५ वर्षांपासून करत आहेत. मात्र, अद्यापही या गावांना योजनेचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला १९८२ साली मंजुरी मिळाली. योजनेचे भूमिपूजन सन १९८४ साली करण्यात आले. त्यानंतर शासनाने १९९५ मध्ये सुधारित योजनेमध्ये ६ व्या टप्प्यात जत तालुक्याचा या योजनेत समाविष्ट केला. तालुक्याच्या पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागात पाणी आले. परंतु, पूर्व भागातील ६४ गावे आजही पाण्यापासून वंचित आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून या भागातील जनता पाण्याची मागणी करत आहे. परंतु, अद्यापही ही मागणी पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे आणि कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारच्या हालचाली दिसत नाहीत.

जत पूर्व भागातील ६४ गावांतील सुमारे ९० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. निवडणुका आल्या की, तुम्हाला म्हैसाळचे पाणी देतो, असे सांगून मते घेतात. त्यानंतर पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचे, ही जणू परंपराच सुरू आहे. 

पूर्व भागातील सनमडी गावात म्हैसाळचे पाणी आले आहे. तेथून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात पाणी गेले आहे. सरकारने दहा किलोमीटरचा कालवा खुदाई केल्यास पूर्व भागातील तलाव पावसाळ्यात सायफन पध्दतीने भरून घेता येणे शक्य आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com