बागा पुनर्लागवडीसह सफाईसाठी अर्थसाह्य द्या 

निसर्ग चक्रीवादळात मंडणगड, दापोलीसह श्रीवर्धनमधील सुमारे २७२० हेक्टर नारळ बागांचे नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी बागायतदारांना आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.
बागा पुनर्लागवडीसह सफाईसाठी अर्थसाह्य द्या 
बागा पुनर्लागवडीसह सफाईसाठी अर्थसाह्य द्या 

रत्नागिरी ः निसर्ग चक्रीवादळात मंडणगड, दापोलीसह श्रीवर्धनमधील सुमारे २७२० हेक्टर नारळ बागांचे नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी बागायतदारांना आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. सुरुवातीला बागा सफाईसाठी मोफत इंधन आणि पुनर्लावगडीसाठी हायब्रीड जातीची नारळ रोपे मोफत उपलब्ध करून दिली जावीत, अशी शिफारस केंद्रीय नारळ बोर्ड समितीने केंद्र शासनाकडे केली आहे.  जून महिन्यात पहिल्याच दिवशी आलेल्या चक्रीवादळाने रत्नागिरी, रायगड या दोन्ही जिल्ह्याला तडाखा दिला. त्याचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, गुहागर या तीन तालुक्यांना बसला. रायगडमध्ये श्रीवर्धन तालुका सर्वाधिक बाधित झाला. घरांसह नारळ, सुपारी, आंबा, काजूच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या. शासनाकडून याचे पंचनामे करण्यात आले. त्यापाठोपाठ केंद्रीय समितीनेही पाहणी केली. या तालुक्यात नारळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे केंद्रीय नारळ बोर्डाच्या समितीचा विशेष दौरा या दोन्ही जिल्ह्यात झाला. यामध्ये केंद्रीय नारळ बोर्डाच्या समितीचे सदस्य म्हणून भाट्ये प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख वैभव शिंदे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  दोन्ही भागातील ८५ टक्के नारळ बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. यामध्ये २७२० हेक्टरवरील नारळाची ४ लाख ७७ हजार झाडे जमीनदोस्त झाली आहेत. रायगडमधील श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगर आणि तळा गावात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. या समितीने नारळ बागायतदारांना मदत करण्यासाठी महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. अनेकांच्या बागांमधील उद्ध्वस्त झाडे साफसफाई करण्यासाठी आवश्यक यंत्रे, इंधन उपलब्ध करून दिले पाहिजे. बागा पुनरुज्जीवन करून बागायतदारांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी बागांची सफाई आवश्यक आहे. नारळाची हायब्रीड जातीची रोपे या बागायतदारांना दिली तर त्यातून लवकर उत्पन्न मिळणे शक्य आहे. त्यासाठी ही रोपे शासनाच्या योजनेतून मोफत दिली पाहिजे. सध्या येथील लोकांना आर्थिक हातभाराची गरज असल्याचे अहवालात नमूद केले आहे.  दोन्ही जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर तेथील परिस्थितीचा अहवाल तयार केला आहे. केंद्रीय नारळ बोर्डामार्फत तो केंद्रीय कृषी विभागाकडे जाणार असून त्यावर मदतीसाठी पावले उचलली जाणार आहेत. त्यानंतर नारळ बागायतींसाठी आवश्यक पावले उचलली जातील.   - डॉ. वैभव शिंदे, समिती सदस्य 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com