महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा नदीकाठ तुटला

कृष्णा नदीकाठी माझी शेतजमीन आहे. नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याच्या प्रवाहाने माझी २० गुंठ्यांतील शेतजमीन सुमारे ३० फूट खोल अशी वाहून गेली आहे. अन्य शेतकऱ्यांचीही जमीन वाहिली आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने भरपाई देऊन शेतकऱ्यांना उभे राहण्यास मदत करावी. - अजय घाडगे, शेतकरी, शिवडे
पुर
पुर

कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना आलेल्या महापुराबरोबर नदीकाठचे पात्रही वाहिल्याचे वास्तव पूर ओसरल्यानंतर समोर आले आहे. पुराच्या पाण्याच्या मोठ्या लोटाच्या प्रवाहाने नदीकाठही मोठ्या प्रमाणात तुटला असून त्यावरील जमीन पिकांसकट वाहून गेली आहे. पुराने अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर हे नवीनच संकट उभे राहिल्याने ते हवालदील झाले आहेत. नदीकाठची ही स्थिती मात्र नदीकाठावरील नागरी वस्त्यांना धोक्याची घंटाच ठरली आहे.  सलग दोन आठवड्यापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेले पाणी यामुळे कोयना-कृष्णा नद्यांना महापूर आला. त्यामुळे नदीकाठची पिके पूर्णतः पाण्यात गेली. त्यातच पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत असल्याने पाण्याबरोबर नदीकाठची मळीची जमिनीही पिकांसकट वाहून गेली आहे. सलग पाच दिवसाहून अधिक काळ महापुराच्या फटक्यात जमीन वाहत राहिल्याने पूर ओसरल्यानंतर नदीची पाणी पातळी पूर्ववत होत असताना हे वास्तव समोर आले आहे.  नदीकाठच्या मळीच्या शेतजमीनीही वाहिल्याने शेतकऱ्यांपुढे नवीनच संकट उभे राहिले आहे. अगोदरच पिके पाण्याखाली राहिल्याने ती हातची गेली आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. त्यातच जमिनीबरोबर पिकेही वाहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नद्यांच्या काठी नदीपात्र तुटून ते नागरी वस्तीकडे सरकू लागले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरी वस्त्यांनाही धोका निर्माण झाला असुन ती नागरी वस्तीसाठी धोक्याची घंटाच ठरली आहे.   

शेतीपंपांच्या मोटारीही वाहिल्या  कोयना-कृष्णा नदीपात्रात ५ ते ९ ऑगस्टदरम्यान अचानक चौपटीने पाणी वाढले. त्यामुळे ते पाणी पात्राबाहेर येऊन नागरी वस्तीत घुसले. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेतीपंपांच्या मोटरी काढायलाही संधी मिळाली नाही. पहिल्यांदाच पाणी अचानक मोठ्या प्रमाणात आल्याने मोटारी काढायला तिथपर्यंत जाताच आले नाही. त्यामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या मोटरीही वाहून जाऊन मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या तुलनेत भरपाई द्या  आत्तापर्यंत आलेल्या महापुरात यावेळचा महापूर मोठा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच पाण्यालाही मोठा वेग असल्याने त्याबरोबर नदीकाठची शेती पिकांसकट वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून नुकसानीच्या आकड्यांचा विचार करून त्या तुलनेत भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com